शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पणनची कापूस खरेदी तात्पुरती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर ४२०० ते ४८०० रूपयापर्यंत खाली आले आहेत. तर पणनचे दर ५४५० आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्राकडे कापसाची आवक वाढली. वाढत्या उन्हाने कापसाला आग लागण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई केली आहे. जिल्ह्यातील काही केंद्रांवर गर्दी कायम आहे. पंचनाम्यानंतर राहिलेला कापूस पणन महासंघ खरेदी करणार आहे.

ठळक मुद्देशेकडो वाहनांच्या रांगा : धुलीवंदनानंतरच केंद्र उघडण्याचे संकेत, व्यापाऱ्यांची होतेय चांदी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खुल्या बाजारात कापसाचे दर कोसळले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा पणनच्या केंद्राकडे वळल्या आहेत. या ठिकाणी कापूस ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. परिणामी पणन महासंघाने जिल्ह्यातील कापूस खरेदी तूर्त बंद केली. आता धुळवडीनंतरच कापूस खरेदी सुरू होणार आहे.सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर ४२०० ते ४८०० रूपयापर्यंत खाली आले आहेत. तर पणनचे दर ५४५० आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्राकडे कापसाची आवक वाढली. वाढत्या उन्हाने कापसाला आग लागण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई केली आहे. जिल्ह्यातील काही केंद्रांवर गर्दी कायम आहे. पंचनाम्यानंतर राहिलेला कापूस पणन महासंघ खरेदी करणार आहे. ही खरेदी तात्पूरती बंद आहे. पणनचे केंद्र तात्पूरते बंद होत आहेत. मात्र सीसीआयची खरेदी सुरू आहे. अशा स्थितीत व्यापाºयांनी पडलेल्या दरात कापूस लाटण्यासाठी सीसीआयने खरेदी बंद केल्याची अफवा पेरली.शासकीय तूर खरेदीसाठी ३२ खासगी गोदामांची पाहणीशासकीय गोदामामध्ये तूर ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही. यामुळे खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता जिल्हा प्रशासनाने तूर खरेदी करण्यासाठी खासगी गोदाम भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३२ गोदामांची पाहणी केली. सध्या व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत. राज्य शासनाने ५८०० रूपये क्विंटलचे दर जाहीर केले आहे. मात्र खुल्या बजारात ४८०० पर्यंतच दर मिळत आहे. शासनाच्या हमी केंद्रात तूर विकण्यासाठी शेतकरी तयार आहेत. नाफेडने तूर खरेदी करण्यासाठी शासकीय गोदामाची अट ठेवली आहे. शासकीय गोदामात जागाच नसल्याने नाफेडची खरेदी थांबली होती. अखेर खासगी गोदाम, खरेदी विक्री संघ आणि इतर ठिकाणी तूर खरेदीसाठी जागा रिक्त आहे काय याची विपणन अधिकारी अर्चना माळवे यांच्या नेतृत्वात चमूने पाहणी केली.जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ८१ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. खरेदीत सुसूत्रता यावी म्हणून केंद्र तात्पुरते बंद आहेत. पुन्हा खरेदी सुरू होईल.- चक्रधर गोस्वामी, विभागीय व्यवस्थापक, पणनयेत्या दोन दिवसात तूर खरेदीचा प्रश्न सुटेल. शेतकºयांना खुल्या बाजारातील लुटीपासून संरक्षणही मिळेल.- एम. देवेंद्र सिंह, जिल्हाधिकारी

टॅग्स :Marketबाजारcottonकापूस