शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा विद्यार्थी हिताला खो

By admin | Updated: July 17, 2014 00:22 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात पुढे जावा यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात असले तरी, त्याला शिक्षकांकडूनच मूठमाती मिळत आहे. जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या उपक्रमांकडे

राळेगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात पुढे जावा यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात असले तरी, त्याला शिक्षकांकडूनच मूठमाती मिळत आहे. जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या उपक्रमांकडे या शिक्षकांनी पाठ फिरविल्याचे वास्तव आहे. ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत घेतलेल्या आढाव्यात ही बाब स्पष्ट झाली आहे. राळेगाव तालुक्यात महत्त्वपूर्ण योजना राबविल्या गेल्या नसल्याची बाबही पुढे आली आहे. सदर उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पंचायत समितीला भेट देवून विविध विभागाच्या कामाचा आढावा घेतला. काही विभागाने अनेक महत्त्वाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या नसल्याची बाब पुढे आली आहे. येथून अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी वाटखेड, सावनेर, रावेरी येथील शाळांना भेट दिली. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य होती. अनेक विद्यार्थी इंग्रजी आणि गणित विषयात माघारल्याचे आढळले. जिल्हा परिषदेने शिक्षकांसाठी ‘एक दिवस गावाकरिता’ हा उपक्रम हाती घेतला. प्रत्येक शुक्रवारी शिक्षकाने मुख्यालयी राहून किमान तीन ते चार विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट घ्यावी, त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक बाबींची विचारपूस करावी, असा हा उपक्रम आहे. मात्र याकडे बहुतांश शिक्षकांनी पाठ फिरविल्याचे तपासणीत दिसून आले. शालेय पोषण आहाराबाबतही शिक्षक फारसे गंभीर नसल्याचे लक्षात आले. वाढोणाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कर्तव्यात कसूर सोडत असल्याची बाब दिसून आली. पंचायत विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांतर्गत ६७१ घरकुलं अपूर्ण असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. येवती येथील प्राथमिक उपकेंद्राची इमारत जागेअभावी बांधली गेली नाही, जलपूर्ती योजनेचे दोन कोटी रुपये शिल्लक असल्याचे तपासणीत आढळून आले. विविध योजनांतर्गत शौचालय बांधकामाची रक्कम लाभार्थ्यांना देण्यात आली नाही. समाज कल्याण विभागातून पुरविले जाणारे साहित्य धूळ खात पडून होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी याबाबत असमाधान व्यक्त करत वस्तूंचे वाटप निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांना तत्काळ करण्याच्या सूचना केल्या. बांधकाम विभागाच्या अनेक तक्रारी त्यांच्या निदर्शनास आल्या. त्याचे निरसन करावे, असे आदेश त्यांनी दिले. आढावा बैठकीला अध्यक्ष प्रवीण देशमुख, उपाध्यक्ष ययाती नाईक, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे, पंचायत समिती सभापती अशोक केवटे, उपसभापती नलिनी पराते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, डॉ. प्रशांत रूमाले, कृषी विभागाचे जगन राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मीक इंगोले, पंचायत समिती सदस्य सुरेश मेश्राम, बेबीताई जवादे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, गटशिक्षणाधिकारी नभा सिंगलवार यांच्यासह तालुक्यातील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)