शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठिय्या आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: November 24, 2014 23:07 IST

भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात शेतकऱ्यांना लागवड खर्चाच्या अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव देण्याचे जाहीर केले होते. आता दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता असून,

यवतमाळ : भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात शेतकऱ्यांना लागवड खर्चाच्या अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव देण्याचे जाहीर केले होते. आता दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता असून, त्यांनी आपल्या आश्वासनाची पूर्ती केली नाही. शेतकऱ्यांच्या मालाला जाहीर केलेला दर द्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात दाभडी येथे शेतीच्या मुद्यावरच विशेष कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमात उत्पादन खर्चावर अधिक ५० टक्के नफा मिळेल इतका हमीभाव शेतमालाला दिला जाईल असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र या आश्वासनाची पूर्तता शासनाकडून अद्यापही करण्यात आली नाही. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार म्हणून काम करताना सातत्याने शेतमालाच्या हमीभावासाठी आग्रही भुमिका घेतली आहे. आता मात्र मुख्यमंत्रीही शेतमालाला त्यांनी मागणी केलेला भाव देण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. २०१४-१५ या वर्षासाठी कृषिमूल्य आयोगाने पिकांचे जाहीर केलेल दर शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आहेत. कापसाला सहा हजार प्रती क्विंटल आणि सोयाबीनला पाच हजार, धानाला तीन हजार रुपये प्रती क्विंटल दर द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन ३० नोव्हेंबरपासून करण्यात येत आहे, असे चटप यांनी सांगितले. यावेळी जिल्हा संघटक देवेंद्र राऊत, जयंतराव बापट, नितीन देशमुख, रमेश मांगुळकर, इंदरचंद बैद, बालाजी काकडे, द.रा. राजूरकर आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)