शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्य कर्मचारी वर्षानुवर्षे बदलीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 27, 2015 01:40 IST

जिल्ह्यातील टिपेश्वर आणि पैनगंगा या दोन अभयारण्यातील अनेक कर्मचाऱ्यांना गेल्या १५ ते २० वर्षांपासून प्रादेशिक विभागात बदलीची प्रतीक्षा आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील टिपेश्वर आणि पैनगंगा या दोन अभयारण्यातील अनेक कर्मचाऱ्यांना गेल्या १५ ते २० वर्षांपासून प्रादेशिक विभागात बदलीची प्रतीक्षा आहे. मात्र दरवर्षी त्यांचा हिरमोड होतो आहे. यवतमाळ जिल्ह्यात या दोन अभयारण्यात टिपेश्वर, उमरखेड, बिटरगाव आणि खरबी हे चार वनपरिक्षेत्र आहे. तेथे शंभरावर वन कर्मचारी तैनात आहे. मात्र यातील अर्ध्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून वन्यजीव क्षेत्राबाहेर प्रादेशिक वन विभागात बदल्या झालेल्या नाहीत. या बदल्यांसाठी या वन कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. ४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या वन कर्मचाऱ्यांना अभयारण्यात नेमणूक देऊ नये, असे आदेश आहे. मात्र त्यानंतरही सेवानिवृत्तीवरील कर्मचाऱ्यांना अभयारण्यात नेमणुका दिल्या जात आहे. तर तरुणतूर्क वन कर्मचाऱ्यांना प्रादेशिक विभागात नेमले जाते. वन खात्यात अभयारण्यात नेमणूक झाल्यास बहुतांश कर्मचारी आर्थिक आणि राजकीय बळावर परस्परच या बदल्या रद्द करून घेतात. अभयारण्याऐवजी सागवान तस्करीतून वरकमाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रादेशिक वनविभागात हे कर्मचारी सोईच्या ठिकाणी आपली नियुक्ती करून घेतात. पर्यायाने नवे कर्मचारी अभयारण्यात नोकरीसाठी येत नाहीत आणि जुन्यांना वर्षानुवर्षे होऊनही अभयारण्याबाहेर प्रादेशिक विभागात नोकरी करण्याची संधी मिळत नाही. पूर्वी या अभयारण्याचा कारभार अकोला येथून चालत होता. मात्र आता पांढरकवडा येथे स्वतंत्र वन्यजीव विभाग सुरू करण्यात आला असून तेथे उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचे पद मंजूर करण्यात आले आहे. मात्र अभयारण्यात अनेक जागा रिक्त आहेत. खरबी येथील विशेष सेवेचे वन परिक्षेत्र अधिकारी पद रिक्त आहे. वन कार्यालयांमध्ये लिपिकवर्गीय यंत्रणा नाही. शासनाच्या मनाईनंतरही नाईलाजाने का होईना वन मजुरांना शासकीय कार्यालयांमध्ये वापरले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहे. १५ ते २० वर्ष होऊनही अभयारण्याबाहेर निघण्याची संधी मिळत नसल्याने वन कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)