शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासाची कामे ठप्प

By admin | Updated: November 24, 2014 23:07 IST

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. आता जवळपास एक महिना या आंदोलनाला पूर्ण होत आला आहे. ग्रामसेवकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने

राळेगाव : यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. आता जवळपास एक महिना या आंदोलनाला पूर्ण होत आला आहे. ग्रामसेवकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने अद्यापही हे आंदोलन संपलेले नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बहिष्कार टाकून ग्रामसेवकांनी हे असहकार आंदोलन पुढे रेटत नेले आहे. या आंदोलनामुळे ग्रामविकासाची कामे मात्र ठप्प झाली आहे.
ग्रामसेवकांची त्यांच्या ग्रामपंचायतस्तरावरील दैनंदिन कामे सुरू आहेत. पण जिल्हा परिषदस्तरावर, पंचायत समितीस्तरावर होणाऱ्या बैठकांत, शासन व जनप्रतिनिधींच्या विविध योजना, कार्यक्रम राबविणे, सूचना देणे, सुरू असलेल्या तथा पूर्ण झालेल्या कामाचा आढावा घेणे आदी बाबी थांबल्या आहेत.
सप्टेंबर, आॅक्टोबर महिना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत गेला. त्यानंतर दिवाळी झाली. दिवाळीनंतरच्या दोन आठवड्यात अनेक शासकीय सुट्या आल्या. त्यानंतर ग्राम विकासासंदर्भातील विविध कामांचा वेग वाढेल, अशी अपेक्षा असताना ग्रामसेवकांचे बहिष्कार व असहकार आंदोलन सुरू झाले. ग्रामसेवकांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. चर्चेत काही मागण्या मान्य करण्यात आल्या. पण इतर मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही.
ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकाऱ्यांवर सेवा काळात कोणताही कसूर, चूक, तक्रारीवर लगेच निलंबनासारखी कडक कारवाई केली जाते. पण त्यांच्या हिताच्या मागण्या पाच-पाच वर्षे सोडविल्या जात नाही. संबंधितांकडून वारंवार टोलवाटोलवी केली जाते, असा आरोप संघटनेकडून होत आहे. आताही ग्रामसेवकांनी प्रथम आंदोलन मागे घ्यावे, त्यानंतर इतर मागण्यांवर विचार करू, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. यात तडजोड झाली नसल्याने हे असहकार आंदोलन पुढे चिघळू नये, यासाठी दोनही बाजूंनी दोन पावले समोर जाण्याची गरज आहे.
नागरिकांच्या वैयक्तिक विकासाच्या, हिताच्या योजना, ग्रामपंचायतीच्या भौतिक, सार्वजनिक विकासाच्या योजना राबविण्याच्या आणि त्या पूर्ण करण्याचा हाच अत्यंत महत्त्वपूर्ण कालावधी आहे. मात्र यासाठी दोनही बाजूंनी लवचिकता दाखवून आंदोलन आटोपते घेण्याच्यादृष्टीने प्रयत्नांची गरज आहे. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे अपेक्षित असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष एम.डी. मस्के यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)