शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नद्यांचे पुनरूज्जीवन

By admin | Updated: December 28, 2016 00:26 IST

जलयुक्त शिवार अभियांनातर्गत जिल्ह्यात नदी पुनर्जीवन कार्यक्रम राबविण्यासंदर्भात नदी पुनर्जीवन कार्यक्रमास शासनाने मान्यता दिली आहे.

१०४ कामांना मंजुरी : पहिल्या टप्प्यात १६ कोटी ५५ लाखांची कामे होणार
यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियांनातर्गत जिल्ह्यात नदी पुनर्जीवन कार्यक्रम राबविण्यासंदर्भात नदी पुनर्जीवन कार्यक्रमास शासनाने मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात दारव्हा, दिग्रस, घाटंजी, कळंब या तालुक्यांतील नद्यांचे पुनर्जीवन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत १०४ कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी १६ कोटी ५५ लक्ष रूपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे.
शासनाने १७ डिसेंबरच्या ओदशान्वये, जिल्हाधिकाऱ्यांना मान्यता दिलेल्या प्रस्तावाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या कामांमधून जलसमृद्धी आली. त्यामुळे हिवाळ्यात किवा उन्हाळ्याच्या सुरवातीलाच कोरड्या पडणाऱ्या नदींचे जलयुक्तच्या कामांमधून पुनर्जीवन करण्याची कल्पना पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनासमोर ठेवली. प्रशासनामार्फत तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्याची दखल घेत नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी पुनर्जीवन योजनेबाबत जलसंधारण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत जिल्ह्यातील नदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत प्राप्त प्रस्तावावर चर्चा होऊन दारव्हा, दिग्रस, घाटंजी, कळंब तालुक्यातील नदी, नाला, ओढानिहाय नवीन सिमेंट नालाबांध कार्यक्रमास मान्यता देण्यात आली. त्यानुसार, दारव्हा तालुक्यातील कुपटी व डुंगरी नदीवर अनुक्रमे १५ व २१ कामांना, दिग्रस तालुक्यातील धावंडा नदीवर ३९ कामांना, घाटंजी तालुक्यातील झुली ते खुनी नदीवर २३ कामांना आणि कळंब तालुक्यातील चक्रावती नदीवर ६ अशा एकूण १०४ कामांना मंजुरी देण्यात आली.
अशाप्रकारे १०४ कामांसाठी १६ कोटी ५५ लक्ष ४ हजार रूपयांच्या निधीसही मान्यता देण्यात आली. यासंदर्भात शासनाच्या निर्देशानुसार प्रक्रिया पूर्ण करून ही कामे सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या ओदशात देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी लोकवर्गणी, श्रमदान व लोकसहभागातून जलयुक्त शिवारची कामे होत आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने नदी पुनर्जीवन कार्यक्रम सुरू केल्याने अनेक गावातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात पालकमंत्र्यांनी दिली. जलयुक्त शिवारमुळे पावसाचे पाणी अडल्याने असंख्य शेतकऱ्यांना सिंचनाची मोठी सुविधा झाली आहे. नदी पुनर्जीवन कार्यक्रमामुळे या सिंचन क्षेत्राता मोठी वाढ होणार आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्यांसाठी जलयुक्त शिवार अभियानातून पुनर्जीवन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)