शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा दुष्काळ

By admin | Updated: May 15, 2016 02:03 IST

पांढरकवडा ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे सर्वच विभागांचे कार्यालय आहे. त्यामुळे बाराही महिने येथे नागरिकांची गर्दी असते.

गंभीर समस्या : पांढरकवडा शहरात पाणपोर्इंची संख्या कमीच, पाण्यासाठी वणवण सुरूचपांढरकवडा : पांढरकवडा ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे सर्वच विभागांचे कार्यालय आहे. त्यामुळे बाराही महिने येथे नागरिकांची गर्दी असते. मात्र ऐन उन्हाळ्याच्या दिवसातही शहरातील सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने सर्वत्र पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे.येथील बसस्थानक, शासकीय कार्यालये, विविध बँकेच्या शाखा, आदी ठिकाणी दररोज नागरिकांची प्रचंड गर्दी असते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसातही या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची थातुरमातूर व्यवस्था केलेली दिसते. मात्र तेथे घाणीमुळे पाणी कुणीच प्राशन करू शकत नाही. पाण्याचा वापर केवळ हात-पाय धुण्यासाठी केला जात आहे. सध्या बसस्थानकात थंड पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. शहरात काही ठिकाणी केवळ एक-दोन माठ ठेवून काही सामाजिक कार्यकर्ते व संघटना आपले कर्तव्य पूर्ण झाल्याचे समाधान मानत आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागातही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पंचायत समिती कार्यालयात मात्र बाराही महिने मुबलक व थंड पाणी उपलब्ध असते. तसेच दरवर्षी केळापूर येथील जगदंबा संस्थानतर्फे पाणपोईची व्यवस्था केली जाते. त्यासाठी येथील नगरपरिषद पाणी पुरवठा करीत आहे. हे एकमात्र उदाहरण सोडले, तर शहरात कुठेही पाणपोईची सुरूवात झालेली नसल्याचे दिसते. शहरात तहसील, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालय, न्यायालय आदी महत्त्वाची कार्यालये आहे. तेथे तालुक्यातील नागरिक आपापल्या कामानिमित्त दररोज येत असतात. मात्र त्यांची तहान भागविण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे दुरापास्त झाले आहे. अधिकारी व सामाजिक संस्थांमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात काही परिसरात पाणपोई सुरू करण्याची योजना अद्याप कार्यान्वित होऊ शकलेली नाही. बसस्थानकात पेयजलसाठी जलकुंभही उभारण्यात आलेले नाही. दरवर्षी प्रवाशांना टाकीमधूनच नळाद्वारे येणारे गरम पाणीच प्राशन करावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)मे चा उत्तरार्ध आणि जूनमध्ये होणार भयावह अवस्थागेले १५ दिवस सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला नाही. मात्र आता मे महिन्यात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे तसेच जूनमध्येही पाणी प्रश्न निर्माण गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. परिणामी नागरिकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी दाहीदिशा पालथ्या घालाव्या लागण्याची शक्यता आहे. बाटली बंद पाणी त्यांना आधार देईल. मात्र सामान्य नागरिकांना बाटली बंद पाणी घेणे परवडणारे नाही. त्यामुळे त्यांची फरफट होण्याची शक्यता बळावली आहे.