शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

भूसंपादनावरून पोलीस व महसूल पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 9:41 PM

नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अर्जुना येथे महामार्गात येणाऱ्या घरांचा मोबदला देऊन जमीन संपादित केली आहे. भूसंपादनात केवळ एक घर शिल्लक असल्याने तेथे ताबा घेण्यासाठी गेलेल्या महसूल व पोलीस पथकावर एकाच कुटुंबातील तिघांनी हल्ला केला.

ठळक मुद्देअर्जुना येथील घटना : ठाणेदार व दोन महिला पोलीस जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अर्जुना येथे महामार्गात येणाऱ्या घरांचा मोबदला देऊन जमीन संपादित केली आहे. भूसंपादनात केवळ एक घर शिल्लक असल्याने तेथे ताबा घेण्यासाठी गेलेल्या महसूल व पोलीस पथकावर एकाच कुटुंबातील तिघांनी हल्ला केला. यात ठाणेदारासह दोन महिला पोलीस जखमी झाल्या. ही घटना बुधवारी दुपारी १.३० वाजता घडली.भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही अर्जुना येथील रवींद्र गोकुलप्रसाद जयस्वाल यांनी त्यांचे राहते घर रिकामे केले नाही. या जागेचा ताबा घेण्यासाठी नायब तहसीलदार शिल्पा नगराळे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक अर्जुना येथे पोहोचले. यावेळी रवींद्र गोकुलप्रसाद जयस्वाल, नीता रवींद्र जयस्वाल व रोशन रवींद्र जयस्वाल यांची महसूल कर्मचाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. घराचा मोबदला योग्य मिळाला नसल्याचा आक्षेप जयस्वाल कुटुंबियांनी घेतला. पथकातील कर्मचारी समजूत काढत असतानाच नीता जयस्वाल यांनी आक्रमक पवित्रा घेतला. महिला पोलीस शिपाई शीला खडसे व आशा नाईक या दोघींवर हल्ला केला. तसेच इतर कर्मचाºयांवर दगडफेक सुरू केली.यातील विटेचा तुकडा पोलीस निरीक्षक दीपक पवार यांना लागला. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत तिघांनाही ताब्यात घेतले. वाहनात डांबून त्यांना ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी नायब तहसीलदार शिल्पा नगराळे यांनी जयस्वाल कुटुंबीयांविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून हल्ला केल्याची तक्रार दिली. तसेच जखमी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडूनही तिघांविरुद्ध तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणात कोणतीही नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात घेण्यात आली नव्हती. मात्र आरोपींच्या अटकेसाठी न्यायालयाकडे रीतसर परवानगीचा अर्ज ग्रामीण पोलिसांनी केला होता.काही काळ तणावभूसंपादनासाठी अर्जुना येथे केवळ एकाच घराचा अडथळा आहे. तो समजुतीने दूर करण्यासाठी गेलेल्या पथकांसोबत वाद झाला यामुळे घटनेला वेगळे वळण मिळाले.

टॅग्स :PoliceपोलिसNational Highwayराष्ट्रीय महामार्ग