शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

पूस धरणात एक टक्काच साठा

By admin | Updated: May 29, 2016 02:33 IST

पूस धरणाची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीपुरवठा करताना नगरपालिकेची दमछाक होत आहे.

पाण्याचा अपव्यय टाळा : १ जूनपासून पुसदकरांना चार दिवसाआड होणार पाणीपुरवठा पुसद : पूस धरणाची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीपुरवठा करताना नगरपालिकेची दमछाक होत आहे. धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवनामुळे पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे १ जूनपासून पुसद शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरणातून सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सहजपणे होऊ शकतो. एवढा जलसाठा पूस धरणात आहे. असे नगर पालिकेकडून संकेत देण्यात येत होते. मात्र एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. तसेच धरणातून होणाऱ्या पाणी चोरीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. आज पूस धरणाचा जलसाठा केवळ एक टक्का आहे. पाणी पातळीतील ही प्रचंड घट चिंतेची बाब आहे. १ जूनपासून चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी सांगितले. महिनाभरापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. आता जलसाठा नाममात्र उरल्यामुळे पाणीपुरवठ्याचा कालावधी पाच दिवसापर्यंत वाढविण्यात येणार आहे. १ जूनपासून पुसद शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असून २० जूनपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकणार आहे. त्यापूर्वी पावसाने हजेरी लावली तर पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊ शकेल. पूस धरणात एक टक्काच जलसाठा आहे. तेव्हा नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी कले आहे. नदीपात्रही कोरडेठाकमे महिना संपत असला तरी पुसदवासी प्रचंड उकाड्याने हैरान झाले आहे. दिवसेंदिवस उन्हाळ््याची तीव्रता वाढतच आहे. पूर्वी पूस नदीला भरपूर पाणी असल्याने मुले उन्हाळी सुटीमध्ये पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत होती. मात्र यावर्षी पूस नदीचे पात्रही प्रचंड तापमानामुळे कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे मुले पोहण्याऐवजी केवळ व्हिडीओ गेम आणि मोबाईल गेममध्येच गुरफटून गेले आहेत. पूस नदी कोरडी पडल्याने उत्साही मुलांचा पुरता हिरमोड झालेला आहे. त्यातत विजेचा लपंडाव आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा दुहेरी संकटाने चिमुकल्यांसाठी उन्हाळी सुटी एक प्रकारे त्रासदायकच ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी) सिंचन विभाग जबाबदार त्यातच अघोषित भारनियमनामुळे शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. १५ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. मार्च महिन्यापर्यंत पूस धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी झाली. हजारो मोटारपंपाच्या माध्यमातून धरणातून पाण्याचा उपसा सुरू होता. जलसाठा स६ा टक्के उरला त्यावेळीही पाणी उपसा करण्यावर सिंचन विभागाने फार उशिरा धडक पावले उचलली. तसेच फेब्रुवारी-मार्च महिन्यात सिंचन विभागाने निर्धारित वेळापत्रकापेक्षा अधिक दिवस कॅनॉलद्वारे पाणी सोडले, त्यामुळे धरणाचा जलसाठा कमी झाला आहे. सध्या पुसदकरांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. याला सिंचन विभागाचे अधिकारी पूर्णत: जबाबदार असल्याचे शहरवासीयांचे म्हणणे आहे.