शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या ‘चाय पे चर्चा’तील दाभडी गाव उपेक्षितचं !

By admin | Updated: May 27, 2016 02:07 IST

‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी दाभडीचाही कायापालट करण्याची ग्वाही दिली होती.

दोन वर्षे लोटली : समस्या जैसे थे, आश्वासनांची पूर्तता नाही आर्णी : ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी दाभडीचाही कायापालट करण्याची ग्वाही दिली होती. परंतु या कार्यक्रमावरून दोन वर्षे लोटली, मात्र दाभडी गावाचा विकास झाला नाही. हे गाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आपली दोन वर्षे पूर्ण केल्यानंतरही उपेक्षितच असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी (जि. यवतमाळ) या गावाला भेट दिली होती. या गावात ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करून त्याद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांशी मोदी यांनी संवाद साधला होता. तुमचे जीवनमान बदलून टाकू, अशी हमी त्यांना दिली होती. मात्र आजही शेतकऱ्यांची स्थिती जैसे थे आहे. ज्या दाभडी गावात हा कार्यक्रम झाला, त्या गावकऱ्यांनाही मी तुमच्या पाठीशी आहे, तुमचा सर्वांगीण विकास करू, असे सांगितले गेले होते. या कार्यक्रमावरून आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार येऊन दोन वर्षे गुरुवारी पूर्ण झाली. परंतु दाभडी गावाचा कोणताच विकास झाला नाही. या गावातील समस्या आजही जैसे थे आहे. (शहर प्रतिनिधी) मंत्री-आमदारांचीही घोषणा हवेत विरली१३ मार्च २०१५ रोजी चंद्रपूर-आर्णीचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पत्रपरिषद घेऊन महाराष्ट्र शासन दाभडी गाव दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास फोन करून ही माहिती दिल्याचे ना. अहीर यांनी पत्रकारांना सांगितले होते. दाभडीच्या विकासासाठी अनेक घोषणाही केल्या गेल्या होत्या. एवढेच नव्हे तर यवतमाळचे भाजपा आमदार मदन येरावार यांनीसुद्धा थेट दाभडीचे तत्कालीन सरपंच संतोष टाके यांच्याशी संपर्क करून दाभडी विकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या होत्या. ग्रामपंचायतीने आपल्या समस्यांची गाथा रातोरात येरावार यांच्याकडे पोहोचविली. ही गाथा मुख्यमंत्र्यांपर्यंत स्वत: पोहचवून दाभडी विकासाचे आश्वासन येरावार यांनी सरपंच व गावकऱ्यांना दिले होते. मात्र आज दोन वर्षे लोटल्यानंतरही दाभडीत विकासाचे तीन-तेरा वाजले आहे. ना. अहीर, आमदार येरावार यांना आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचे दिसून येते. त्यामुळे मोदी सरकार, आपले खासदार-मंत्री, आमदार यांच्या घोषणा फसव्या असल्याची भावना दाभडीवासीयांमध्ये निर्माण झाली आहे.