शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जमीन शेतकऱ्यांची, पाणी उद्योगांना

By admin | Updated: August 23, 2015 02:37 IST

धरण बांधण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमीन हस्तगत करायची अन् त्यावर धरण बांधायचे. प्रत्यक्षात धरणाच्या निर्मितीनंतर प्रकल्पातील पाणी परस्पर उद्योगांकडे वळते करायचे.

सिंचन शोधयात्रेने मांडले वास्तव : पेंटिंग आणि पथनाट्यातून राज्यभरात करणार जनजागृतीयवतमाळ : धरण बांधण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमीन हस्तगत करायची अन् त्यावर धरण बांधायचे. प्रत्यक्षात धरणाच्या निर्मितीनंतर प्रकल्पातील पाणी परस्पर उद्योगांकडे वळते करायचे. असाच छुपा अजेंडा राज्यशासनाचा आहे. यातून शेतकऱ्यांऐवजी उद्योगपतीच श्रीमंत झाले. सरकार बदलले तरी प्रकल्पांबाबतचे धोरण तसेच आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जनमंचच्या वतीने सिंचन शोधयात्रेचे आयोजन करण्यात आले. गत चार महिन्यांपासून सुरू असलेली ही शोधयात्रा यवतमाळात दाखल झाली आहे.शनिवारी यवतमाळच्या पाचकंदिल चौकात जनमंचच्या सिंचन शोधयात्रेने विशेष पेंटिंग साकारली. त्यातून सिंचनाचा प्रश्न सर्वांपुढे मांडला. ही छायाचित्रे पाहण्यासाठी यवतमाळकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी जनमंचच्या वतीने प्रकल्पांच्या प्रश्नावर बोट ठेवण्यात आले. प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला आहे. यातून प्रकल्पाच्या कॅनॉलसह प्रकल्पाला हादरा बसला आहे. यामुळे आजही प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट प्राप्त करता आलेच नाही. आजही धरणातून पूर्ण क्षमतेने ओलित होत नाही.जलप्रकल्पाचे वास्तव शोधण्यासाठी जनमंचच्या कार्यकर्त्यांनी मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. चार महिन्यांपासून जनमंचने हा उपक्रम हाती घेतला आहे. दर १५ दिवसांनी एका प्रकल्पाला भेट दिली जाते. त्या ठिकाणची माहिती छायाचित्ररूपात गोळा करण्यात येते. आतापर्यंत अशा सात प्रकल्पांची माहिती गोळा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तुरागोंदी, लोअर वर्धा, वठाजी पिंपळगाव, कार, सतरापूर, अंभोरा आणि गोसेखुर्द प्रकल्पाचा डावा आणि उजवा कालवा जनमंचच्या कार्यकर्त्यांनी पाहिला. या प्रकल्पावर हजारो कोटी रुपये खर्च झाले. हे काम निकृष्ट आहे. विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. ही संपूर्ण माहिती विदर्भ सिंचन मंडळाकडे सादर करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या निकृष्ट कामाचे प्रदर्शन मुंबईला लावण्यात आले होते. लवकरच विदर्भातील विविध शहरांमध्येही हे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. जनमानसात प्रकल्पाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. जनमंचचा आवाज बुलंद करण्यासाठी नागपूरच्या चित्रकारांचा अलग अँगल ग्रुप, वर्धेचा पथनाट्य ग्रुप एकत्र आला आहे. यावेळी जनमंचचे अध्यक्ष सुरेश शिंदे पाटील, मिली विकमसी, भारती तिवारी, पलक अग्रवाल, पलाश शंकर, प्रवीण चांदेवार, रिद्धी विकमसी, मुकंद बावणे, श्रीकांत परबत, विवेक कवठेकर, राजेश चव्हाण, रवी काळे, मोहन चव्हाण यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)