शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जैन संघटना आपत्तीच्या वेळी धावून जाते

By admin | Updated: January 14, 2016 03:28 IST

गुजरातमध्ये २००१ साली झालेल्या महाविनाशकारी भूकंपानंतर ३६८ शाळांचे निर्माण करून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.

शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प : मदतीसोबत पुनर्वसनही यवतमाळ : गुजरातमध्ये २००१ साली झालेल्या महाविनाशकारी भूकंपानंतर ३६८ शाळांचे निर्माण करून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते. काश्मिरमध्ये आॅक्टोबर २००५ मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी ‘एनडीएमए’ने सर्वप्रथम पुनर्वसन कामासाठी भारतीय जैन संघटनेची मदत घेतली. एका महिन्यात घरे बांधून दिली, असे प्रफुल्ल पारख यांनी सांगितले. अकोला येथे २००२ साली महापूर आला होता. पूरग्रस्तांनी शाळांमध्ये आश्रय घेतला होता. ही मंडळी तेथून बाहेर निघायला तयार नव्हती. त्यावेळी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेऊन १५ हजार नागरिकांसाठी दोन तात्पुरते नगर वसविले आणि शाळा रिकाम्या करून दिल्या, असे ते म्हणाले. त्सुनामीच्या वेळी अंदमान निकोबारमध्ये आपण स्वत: १५ महिने त्या भागात होतो. ३७ बेटांवर शाळा, रुग्णालये उभारण्यात आले. २००८ साली बिहारमध्ये आलेल्या पुरात आमच्या चमूने १८० दिवस वैद्यकीय सेवा दिली. नैसर्गिक आपत्तीच्यावेळी धावून जावून मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही मदतच नाही तर त्यांचे पुनर्वसन करतो, असे पारख यांनी सांगितले. शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासोबतच आपल्या परिसराच्या विकासासाठीही प्रोत्साहीत करतो. १९९७ मध्ये मेळघाटमधून ३०० गावातून ३२८ मुलांची निवड करून पुणे येथे शिक्षण दिले. आज ही मुले आपल्या परिसरात विकासाचे काम करीत आहे. आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षण देवून त्यांना मदतीचा हात भारतीय जैन संघटना देणार आहे. विशेष म्हणजे प्रथमच आम्ही या प्रकल्पासाठी मुलींचीही निवड करीत असल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्या कुटुंबात आत्महत्या झाली असेल तर त्या कुटुंबातील मुलांच्या डोक्यातही आत्महत्येचे विचार घोळत असतात. हे सर्वेक्षणातूनही सिद्ध झाले आहे. पुणे येथे शैक्षणिक प्रकल्प राबविताना तसे अनुभवही आले. परंतु त्या मुलांच्या डोक्यातील आत्महत्येचे विचार करून त्यांचा दृष्टीकोण सकारात्मक करण्याचा प्रयत्नही या प्रकल्पातून होत असल्याचे पारख यांनी शेवटी सांगितले. (नगर प्रतिनिधी)