शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे

By admin | Updated: August 30, 2015 02:17 IST

ग्रामीण भागात नोकरी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे.

नागरिक बेजार : शिक्षकांसह तलाठी, ग्रामसेवकांच्या तालुक्यातून येरझारापोफाळी : ग्रामीण भागात नोकरी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. तरीही बहुतांश कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा करीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे असून सामान्य नागरिकांना मात्र हेलपाटे मारावे लागत आहे. जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकांपासून तलाठी, ग्रामसेवकांपर्यंत सर्वच कर्मचारी तालुक्याच्या गावातून दररोज ये-जा करीत आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील कामकाजावर होत आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ये-जा करीत असल्याने शाळेच्या वेळा पाळल्या जात नाही. बऱ्याच शिक्षकांचे जाणे-येणे परिवहन महामंडळाच्या बसफेरीवर अवलंबून असते. त्यामुळेच शाळा सुटण्याच्या एक तासापूर्वीच शाळेतून निघण्याची घाई सुरू होते. विशेषत: महिला शिक्षिका सायंकाळच्या पूर्वीच घरी पोहोचण्याच्या घाईत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अनियमितता येत आहे. तलाठी, ग्रामसेवक यांची तर एकाधिकारशाहीच निर्माण झाली आहे. तलाठी आणि ग्रामसेवक हे ग्रामीण जनता आणि प्रशासनातील दुवा असतात. मात्र शिक्षकांप्रमाणेच हे कर्मचारीही तालुक्यातून ये-जा करतात. त्यामुळे ऐन कामाच्या वेळेस सर्वसामान्य जनतेला हे कर्मचारी उपलब्ध होत नाही. कर्मचाऱ्यांना वाटेल तेव्हा गावात अवतरतात. परंतु लोकांची कामे रेंगाळलेली असतानाही कित्येक दिवस गावात त्यांचे दर्शन घडत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या लोकांनाच तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तलाठी आणि ग्रामसेवकाचे घर शोधत फिरावे लागते. हीच अवस्था कृषी सहायकांची आहे. शेतकरी आणि कृषी विभागात दुवा साधण्याचे काम कृषी सहायक करतो. शासनाच्या निर्देशाप्रमाणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, शेतीच्या परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन शासनाकडे अहवाल देणे, हे त्याचे काम आहे. मात्र हे कृषी सहायक सध्या गावात किंवा शेतात क्वचितच दिसतात. तालुक्याच्या मुख्यालयी राहून केवळ कागदोपत्री कारभार करीत आहेत. ज्या उद्देशासाठी कृषी सहायकांची नियुक्ती होते, त्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. (वार्ताहर)