शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजी पंचायत समितीचा कारभार ढेपाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:48 IST

घाटंजी : आदिवासीबहुल म्हणून तालुक्याची ओळख आहे. सुमारे १०५ गावांचे सनियंत्रण पंचायत समितीस्तरावर केले जाते. महत्त्वाच्या व संबंधित प्रश्नांसाठी ...

घाटंजी : आदिवासीबहुल म्हणून तालुक्याची ओळख आहे. सुमारे १०५ गावांचे सनियंत्रण पंचायत समितीस्तरावर केले जाते. महत्त्वाच्या व संबंधित प्रश्नांसाठी अनेक गावकरी पंचायत समितीत कामानिमित्त येतात. मात्र, मागील काही दिवसांपासून पंचायत समितीचा कारभार ढेपाळल्याने तक्रारी व समस्या वाढत आहेत.

शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी ९.४५ ते ५.४५ अशी करण्यात आली आहे. मात्र पंचायत समितीत शासकीय कामकाज ११ वाजेनंतर सुरू होते. ४ वाजता सर्व कर्मचाऱ्यांना घरी जाण्याचे वेध लागलेले दिसते. बहुतांश अधिकारी व कर्मचारी यवतमाळ, पांढरकवडा आदी ठिकाणाहून ये-जा करतात. त्यामुळे सर्व लेटलतिफशाही सुरू आहे. विशेष म्हणजे यावर नियंत्रण ठेवणारे गटविकास अधिकारीदेखील स्वतःच यवतमाळवरून ये-जा करीत असल्यामुळे त्यांचे अधिनस्त कर्मचाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही.

कार्यालयीन वेळेतही अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या ओस पडलेल्या दिसतात. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. इतकेच काय तर बाहेरून येणाऱ्या जनतेला साधे पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. मागील एक वर्षापासून पंचायत समितीचे फिल्टर बंद पडले आहे. ते दुरुस्त करण्याची कुणीही तसदी घेताना दिसत नाही. तर बरेच दरवाजे व खिडक्यांचे अलड्राप गायब झाल्याचे दिसते. मागील दोन वर्षांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडलेले आहेत.

गटविकास अधिकारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे या समस्यांचे त्यांना काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसते. कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर गेल्या. परिणामी अनेक ठिकाणी प्रशासक बसले असून, तेथे चौदाव्या वित्त आयोगाच्या शेवटचा हप्ता व पंधराव्या वित्त आयोगातील पहिला हप्त्यातून झालेल्या कामाची व दर्जाची तपासणी होणे आवश्यक आहे. नोकरशाही वरचढ झाल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. अधिकाऱ्यांवर पदाधिकाऱ्यांचाही वचक नसून बीडीओंच्या वागणुकीमुळे सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारीही त्रस्त असल्याचे बोलले जाते.

तालुक्यात पेसाअंतर्गत २६ ग्रामपंचायती आहेत. त्या ठिकाणी चौदाव्या वित्त आयोगाचा शेवटचा हप्ता व पंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यातून लाखो रुपयांची कामे केली गेली. निकषानुसार कामांची गुणवत्ता व लोकोपयोगीतेबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असलेल्या तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गतदेखील गाव पातळीवर खाते काढण्यामध्ये बराच घोळ झाल्याचे बोलले जाते.

बॉक्स

हायमास्ट खरेदीत अनागोंदी

हायमास्ट लाइट खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार झाली. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये १५ वित्त आयोग, ५ टक्के अबंध निधी (पेसा) योजनेंतर्गत हायमास्ट खरेदी करण्यात आले आहेत. लावण्यात आलेले हायमास्ट निकृष्ट दर्जाचे असून, गुणवत्ताहीन खांब व लाइट वापरण्यात आले आहेत. कुठलाही दर्जा नसलेल्या कंपनीचे हायमास्ट बसविण्यात आले आहेत. लाइटची किंमत बाजारमूल्यापेक्षा अधिक देयके अदा करण्यात आली. खरेदी प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्राथमिक स्वरूपात लक्षात येत आहे. मागील ६ महिन्यांतील व आजपावेतो तालुक्यातील सर्व हायमास्ट खरेदी प्रकरणाची तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.

कोट