शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
3
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
4
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
5
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
6
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
7
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
8
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
9
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
10
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
11
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
12
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
13
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
14
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
15
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
16
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
17
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
18
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
19
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
20
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात साडेपाच हजार शस्त्रक्रिया

By admin | Updated: November 24, 2014 23:08 IST

जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून या एक वर्षात ही योजना जिल्ह्यातील रूग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यातील रूग्णालयांसह

जीवनदायी आरोग्य योजना : शस्त्रक्रियांसाठी रूग्णालयांना १३.३७ कोटी
यवतमाळ : जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून या एक वर्षात ही योजना जिल्ह्यातील रूग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यातील रूग्णालयांसह राज्यातील विविध रूग्णालयांमध्ये पाच हजार ६६२ रूग्णांवर या योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. शस्त्रक्रियांसाठी रूग्णालयांना १३ कोटी ३७ लाख रुपये देण्यात आले आहे.
जीवनदायी योजनेंतर्गत जवळजवळ सर्वच आजारांवर दीड लाख रुपये खर्चाच्या मर्यादेपर्यंत या योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येते. ही एक आरोग्य योजना असून या योजनेंतर्गत ९७१ प्रकारच्या आजारांवर मोफत उपचारासोबत १२१ प्रकारच्या आजारांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक लाख ५० हजारापर्यंत तर मूत्रपिंड प्रत्यारोपणाकरिता दोन लाख ५० हजार रुपयापर्यंत योजनेचा लाभ मिळत आहे. योजनेसाठी लाभार्थ्यांजवळ पिवळे किंवा केसरी शिधापत्रक अथवा अन्नपूर्णा, अंत्योदय योजनेचे शिधापत्रक असणे आवश्यक आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत जिल्ह्यात ५ लाख १८ हजार कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहे. त्यात १ लाख ३३ हजार पिवळे शिधापत्रिकाधारक, २ लाख ४७ हजार केशरी शिधापत्रिकाधारक, १ लाख ३४ हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक तर ४ हजार ६९२ अन्नपूर्णा योजनेचे शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा समावेश आहे. या कुटुंबांचे आरोग्य पत्र तयार करून वितरणाचे काम जिल्हयात मोठया प्रमाणावर सुरु आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ९६ हजार कुटुंबांना आरोग्यपत्र वितरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी योजनेचा शुभारंभ तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला होता. २१ नोव्हेंबर रोजी योजनेला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षात जिल्ह्यातील एकूण ५ हजार ६६२ रूग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी १६४२ शस्त्रक्रिया जिल्ह्यातील या योजनेसाठी मान्यताप्राप्त आठ रूग्णालयांमध्ये करण्यात आल्या आहेत. अन्य शस्त्रक्रिया या राज्यातील विविध रूग्णालयांमध्ये झाल्या आहे. जिल्ह्यातील रूग्णालयांना शस्त्रक्रियांसाठी ४० लाख ३९ हजार रुपये वितरित करण्यात आले. तर जिल्ह्यासह राज्यातील विविध रूग्णालयांना १३ कोटी ३७ लाख रुपये शस्त्रक्रियेपोटी देण्यात आले आहे.
आर्थिक अडचणीमुळे खर्चिक शस्त्रक्रिया सर्वसामान्यांना परवडण्यासारख्या नव्हत्या. त्यामुळे गंभीर आजाराप्रसंगी फार मोठे संकट गरीब व गरजू रूग्णांपुढे उभे राहत होते. आता या योजनेंतर्गत सहज शस्त्रक्रिया करता येत असल्याने हजारो रूग्णांना दिलासा मिळत असून त्यांच्यासाठी योजना खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. (प्रतिनिधी)