शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो धीर धरा, सरकार तुमच्या पाठीशी

By admin | Updated: March 4, 2015 01:46 IST

शेतकऱ्यांनो राज्यातील युती सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे आहे,

मुख्यमंत्र्यांचे भावनिक आवाहन : दिलासादायक घोषणांचे संकेत यवतमाळ : शेतकऱ्यांनो राज्यातील युती सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे आहे, तुमच्या सुख-दु:खात सरकार सहभागी आहे, तुमच्या समस्या तत्काळ सोडविल्या जातील, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील, तुम्ही धीर धरा, कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, कुटुंबाचा विचार करा, असे भावनिक आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथील आदर्श गाव रातचांदणा येथे केले. जिल्हा परिषदेतील अमरावती विभागीय आढावा बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री यवतमाळनजीकच्या रातचांदणा गावात पोहोचले. तेथील सरपंच कलावती ब्राह्मणकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. फडणवीस यांनी येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेतकरी अरविंद बेंडे यांच्या शेतातील ग्रीन शेडनेट व रेशीम प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायतीच्या आवारात फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई तातडीने उपलब्ध करून दिल्या जातील, दीर्घ मुदती कर्ज आणि तेही बिनव्याजी देण्याचा विचार सरकार करेल, जिल्ह्यात कापसावर आधारित सूत गिरण्या, टेक्सटाईल्स पार्क उभारले जातील. जिल्ह्यात कामे सुरू आहेत की नाहीत, याची तपासणी उपग्रहाद्वारे मुंबईत बसून केली जाईल. शेतकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा, सरकारला उपाययोजना करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मुख्यमंत्री घोडखिंडी आणि पिंपरी येथील मुक्कामासाठी रवाना झाले. तत्पूर्वी जिल्हा परिषदेसमोर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच जिल्हा दारूबंदीसाठी महिलांनी एक निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांंना दिले. (कार्यालय प्रतिनिधी)