शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

विहीर अधिग्रहणाच्या मोबदल्यात घोळ

By admin | Updated: October 3, 2016 00:19 IST

पाणीटंचाई काळात अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरीचा मोबदला दुसऱ्याच व्यक्तीला देण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील बोंडगव्हाण येथे घडला.

नेर : पाणीटंचाई काळात अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरीचा मोबदला दुसऱ्याच व्यक्तीला देण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील बोंडगव्हाण येथे घडला. संपूर्ण गाव साक्षीदार असलेल्या प्रकरणातही मोबदला मिळविण्यासाठी शेतकऱ्याला पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. बोंडगव्हाण येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने १५ एप्रिल २०१६ रोजी पांडुरंग राऊत या शेतकऱ्याची विहीर अधिग्रहित केली. ग्रामस्थांना नियमित आणि सुरळीत पाणी मिळावे यासाठी फुटलेली पाईपलाईनही या शेतकऱ्याने दुरुस्त केली. टंचाई काळात गावकऱ्यांनी या विहिरीच्या पाण्याचा वापर केला. ग्रामसेवकाने मात्र मोबदला रामभाऊ राऊत यांना दिला. ३६ हजार रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. संपूर्ण गावकऱ्यांनी आपल्या विहिरीचे पाणी वापरले असताना मोबदला दुसऱ्याला कसा, असा प्रश्न पांडुरंग राऊत यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनीही आम्ही पांडुरंग राऊत यांच्या विहिरीचे पाणी वापरल्याचे निवेदन दिले. यानंतरही त्यांना मोबदल्यासाठी संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. ग्रामसेवकाने हा घोळ घातल्याचा आरोप आहे. या संदर्भात ग्रामसेवक के.डी. निबोळकर यांना विचारले असता, विहीर अधिग्रहित केल्याचे दोन्ही शेतकऱ्यांचे ठराव पंचायत समितीला सादर केले होते. पांडुरंग राऊत यांचा अर्ज खारिज झाला होता. रामभाऊ राऊत यांचा अर्ज मंजूर झाल्याने धनादेश त्यांच्या नावाने निघाला, असे ते म्हणाले. यावर शेतकरी पांडुरंग राऊत म्हणाले, आपला अर्ज खारिज झाल्याचे पत्र मिळालेच नाही. ग्रामस्थांनी आपल्या विहिरीचे पाणी वापरले. ठराव मंजूरीचे पत्र आपल्याकडे असताना रामभाऊ राऊत यांच्या नावाने धनादेश कसा काढण्यात आला, हा त्यांचा प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)