शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

खचलेल्या विहिरी जाचक अटीत

By admin | Updated: March 6, 2015 02:11 IST

अतिवृष्टीत खचलेल्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र लाभासाठी २०१२ च्या सर्वेक्षणाचा आधार घेण्याची अट घातली.

यवतमाळ : अतिवृष्टीत खचलेल्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र लाभासाठी २०१२ च्या सर्वेक्षणाचा आधार घेण्याची अट घातली. परिणामी जिल्ह्यात खचलेल्या एक हजार ८०९ विहिरींपैकी केवळ १४१ विहिरींच्या कामांनाच प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या जाचक अटीमुळे खचलेल्या विहीर अनुदानाचा बट्ट्याबोळ होण्याची चिन्हे आहेत.यवतमाळ या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात सिंचन वाढीसाठी सिंचन विहीर खोदण्यासाठी शासनाने अनुदान दिले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विहीरी खोदल्या. मात्र २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या. या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आता शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहे. विहीर दुरुस्तीसाठी शेतकऱ्याला दीड लाख रुपयापर्यंत अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे. खचलेली विहीर दुरुस्त होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अनुदानासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना आता जाचक अटींचा सामना करावा लागत आहे. २०१२-१३ मध्ये अतिवृष्टीने खचलेल्या, बुजलेल्या विहीर दुरुस्तीसाठी त्यावेळी झालेले सर्वेक्षण आणि पंचनाम्याचा आधार घेऊन अनुदान दिले जाणार आहे. मात्र त्यावेळी झालेल्या सर्वेक्षणाबाबत शेतकऱ्यांची ओरड होती. त्यामुळेच जिल्ह्यातील एक हजार ८०९ खचलेल्या सिंचन विहिरींपैकी केवळ १४१ विहिरींच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय मंजुरात मिळाली आहे. २०१२-१३ मध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर सर्वेक्षणाचे काम कृषी सहायक, तलाठी, ग्रामसचिव यांनी गावपातळीवर केले. त्यावेळी शेत खरडी, घरांची पडझड, जनावरे वाहून जाणे, रस्ते, नाले, पूल यांचे नुकसान यावरच सर्वेत भर देण्यात आला होता. दुर्दैवाने विहीर ही शेवटच्या टप्प्यात होती. त्यामुळे अनेक ठिकाणी योग्य सर्वेक्षणच झाले नाही. त्यावर शेतकऱ्यांनी सातत्याने आक्षेपही घेतले. आता त्याच गोलमाल सर्वेच्या आधारावर विहीर बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे. अशा स्थितीत काही राजकीय पुढाऱ्यांनीही आपल्या अधिकारांचा वापर करून यंत्रणेला दबावात आणले आहे. काही तालुक्यांमध्ये खचलेल्या विहिरींची संख्याही अधिक दिसून येते. प्रत्यक्षात पावसाची सरासरी आणि पूरबाधित क्षेत्राचा विचार केल्यास या तालुक्यांमधील अचानक खचलेल्या विहिरींची वाढलेली संख्या संशय निर्माण करणारे आहे. यामागे केवळ राजकीय दबाव कारणीभूत असल्याचेही सखोल चौकशीत बाहेर येण्याची शक्यता आहे. सत्तेत आलो म्हणून आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी अर्ज करण्यास प्रवृत्त केले अनेक शेतकऱ्यांना नेमका शासन आदेश काय आहे याचीच माहिती नाही. मात्र मदत मिळणार या आशेपोटी दीड लाखांच्या मदतीकरिता अनेकांनी पंचायत लोकमतविशेषसमितीकडे प्रस्ताव दिले आहे. यातूनच दारव्हा तालुक्यात ८५४, दिग्रसमध्ये १६८, नेर १३७ अशी आकडेवारी आहे. या उलट प्रशासकीय मंजुरी फक्त नेर तालुक्यातील सात विहिरींनाच मिळाली आहे. अशासकीय मंजुरी देण्याचा अधिकार तहसीलदारांना देण्यात आला आहे. या तफावतीवरून योजनेतील पोलखोल होते. (कार्यालय प्रतिनिधी)