शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जातीय समीकरणाला छेद काँग्रेसची दणादाण

By admin | Updated: May 17, 2014 23:51 IST

जाती-पातीची आकडेमोड करून राजकारणाचे गणित मांडले जात होते. यवतमाळ जिल्ह्यात सर्वच आराखडे आतापर्यंत जातीय समीकरणावरच आखले होते.

दिग्गज आमदारांवरही आत्मचिंतनाची वेळ

यवतमाळ : जाती-पातीची आकडेमोड करून राजकारणाचे गणित मांडले जात होते. यवतमाळ जिल्ह्यात सर्वच आराखडे आतापर्यंत जातीय समीकरणावरच आखले होते. यात बरेचदा विकासाच्या मुद्याला बगलही देण्यात येत होती. यवतमाळ-वाशिम लोकसभेतील निकालाने संपूर्ण जातीय समीकरणालाच छेद दिला आहे. बंजारा आणि कुणबी-मराठा मतदार कुणाच्या बाजूला वळते यावर विजयाचे गणित मांडले जात होते. तर काँग्रेसच्या गोटातून मुस्लीम, आदिवासी, दलित मतांची गोळा बेरीज करण्यात येत होती. निवडणुकीच्या शेवटच्या चरणात हाच एक मुद्दा हाती घेऊन प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. जाहीर सभांमध्ये थेट शिवाजीराव मोघे यांचा बंजारा समाजातील मानसपूत्र म्हणून उल्लेख करण्यात आला. आज निकाल हाती आल्यानंतर जातीपातीच्या संख्येवरून जी विजयाची शिडी तयार केली जात होती त्यात सपशेल अपयश आल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या भावना गवळी यांनाही कुण्या एका जातीच्या पाठिंब्यामुळे मताधिक्य मिळाले हे सांगण्याचे धारिष्ठ्य आज कुणीच करणार नाही. या सर्व आराखड्यांना छेद देण्याचे काम १६ मे रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निकालाने केले आहे. राजकारणाला जातीय रंग देणार्‍यांची मतदारालाही ओळख पटली आहे. काँग्रेसचे मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार वसंत पुरके, वामनराव कासावार, नंदिनी पारवेकर यांनी आपल्या कार्यशैलीत सुधारणा केली नाही. शेवटच्या दिवसात जनतेपुढे गेल्यानंतर त्यांचे रुसवे फुगवे, नाराजी सहज दूर करता येते, या भ्रमातच येथील काँग्रेसचे दिग्गज राहिले. तर शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनाही मोदी लाट असताना विशेष लिड आपल्या मतदारसंघातून देता आली नाही. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची रणनिती बदलविण्यासाठी लोकसभेचा निकाल सूचक ठरणारा आहे. शिवसेनेच्या भावना गवळी यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.