शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 24, 2015 00:07 IST

रस्त्याच्या मधोमध उभा असलेला जनावरांचा कळप. दुकानदारांना दररोज त्रस्त करणारी जनावरे. ग्राहकांच्या ...

अपघाताची भीती : बंदोबस्तासाठी पुढाकारच नाहीउमरखेड : रस्त्याच्या मधोमध उभा असलेला जनावरांचा कळप. दुकानदारांना दररोज त्रस्त करणारी जनावरे. ग्राहकांच्या पिशव्यांमध्ये तोंड घालणारी आणि वेळप्रसंगी टक्कर खेळणारी मोकाट जनावरे उमरखेड शहरात नित्याची बाब झाली आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या जनावरांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले. मोकाट जनावरांचा बंदोबस्त मात्र करण्यास कुणीही पुढे येत नाही.उमरखेड शहराच्या मुख्य रस्त्यासह गल्लीबोळात मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. जनावरांचा हैदोस एवढा वाढला आहे की, नागरिकही जनावर दिसले की, काढता पाय घेतात. येथील नांदेड, ढाणकी, महागाव आणि पुसद रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरांचे कळप दिसून येतात. काही जनावरे तर चक्क रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन बसतात. कितीही हाकलले तरी उठायचे नाव घेत नाही. बसस्थानक परिसर, विश्रामगृह, तहसील, पंचायत समिती या भागात नागरिकांची दररोज गर्दी असते. त्याठिकाणीही मोकाट जनावरे दिसून येतात. या जनावरांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर अंगावर चालून येण्याची भीती असते. मोकाट जनावरांमुळे विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर हातगाडीवर भाजीपाला विकणाऱ्यांना तर या जनावरांचा हमखास त्रास असतो. थोडे जरी लक्ष विचलित झाले तरी जनावर भाजीपाल्यावर ताव मारतात. ग्राहकांच्या हातातील पिशव्यातही तोंड घालायला जनावरे मागे पाहत नाही. अनेकदा या जनावरांच्या टकरीही सुरू असतात. ऐन गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या टकरींमुळे वाहनधारकांची त्रेधा उडते. जीवाच्या भीतीने वाहनधारक सैरावैरा पळतात. त्यातून अपघात होण्याची शक्यता असते. हा सर्व प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. परंतु नगरपरिषद या जनावरांना कोंडवाड्यात टाकत नाही. जनावर मालकांचाही शोध घेतला जात नाही. आज शेकडो जनावरे उमरखेडच्या रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसतात. याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. (शहर वार्ताहर)जनावरांच्या टकरींमुळे नागरिकांची त्रेधाउमरखेड शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या अनेकदा टकरी सुरू असतात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते. जनावरांच्या टकरींमुळे अनेकदा नागरिक आणि वाहनधारक सैरावैरा पळतात. त्यामुळे अपघात होण्याची भीती असते. वर्दळीच्या मार्गावर या जनावरांच्या टकरीत सापडून अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडतात. मात्र या जनावरांचा बंदोबस्त केला जात नाही. त्यांच्या मालकांचा शोध घेऊन कारवाईची मागणी होत आहे.