शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीची पाणीपुरवठा योजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:19 IST

आर्णी ...... येथे नगरपरिषद स्थापन झाल्यापासून पाणीपुरवठा योजना रखडली होती. योजना व्हावी, लोकांना स्वच्छ, मुबलक पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ...

आर्णी ...... येथे नगरपरिषद स्थापन झाल्यापासून पाणीपुरवठा योजना रखडली होती. योजना व्हावी, लोकांना स्वच्छ, मुबलक पाणी उपलब्ध व्हावे म्हणून तत्कालीन मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी योजना मंजूर करून घेतली होती. मात्र, अद्याप योजनेला हिरवी झेंडी मिळाली नव्हती. आता तब्बल ४८ कोटींची योजना मंजूर झाली आहे.

नगरपरिषदेमध्ये काॅग्रेसची एकहाती सत्ता असतानादेखील ही योजना मार्गी लागली नाही. स्रेय लाटण्यासाठी चढाओढ झाल्याने ही योजना वादात सापडली होती. शहराला त्याचा फटका बसला. योजना समोर सरकली नाही. परिणामी सामान्य जनतेला पाणी मिळाले नाही. दरम्यान अनेक घडामोडी झाल्या. मात्र, योज्ना मंज्यॅर झालीच नाही.

योजनेसाठी आत्तापर्यंत अनेकांनी पाठपुरावा केला. विद्यमान नगराध्यक्ष अर्चना अमोल मंगाम यांनीही सतत पाठपुरावा केला. माजी पालकमंत्री संजय राठोड यांनीही पाठपुरावा केला. त्यामुळे आता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोरोत्थान महाभियानमधून शहरात पाणीपुरवठा प्रकल्पास मंगळवारी मंजुरी देण्यात आली. ४८ कोटी ३२ लाखांची ही योजना मंजूर झाली. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आता अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा आहे.

योजनेसाठी सगळे नगरसेवक एकत्र आले. तीच भावना कायम ठेवणे गरजेचे आहे, अशी सामान्य लोकांची इच्छा आहे. योजना मार्गी लागल्याने शहरात आनंद व्यक्त केला जात आहे.