शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

अंधरवाडी अद्याप अंधारातच

By admin | Updated: November 27, 2014 23:43 IST

पाटणबोरीपासून अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावरील अंधरवाडी हे गाव अद्यापही अंधारातच चाचपडत आहे. टिपेश्वर अभयारण्याच्या बाजूला आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले या गावाला

नीलेश यमसनवार - पाटणबोरी
पाटणबोरीपासून अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावरील अंधरवाडी हे गाव अद्यापही अंधारातच चाचपडत आहे. टिपेश्वर अभयारण्याच्या बाजूला आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले या गावाला स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही साधा रस्ता मिळाला नाही.
पाटणबोरी येथून पश्चिमेस साडे तीन किलोमीटर अंतरावरील १०० टक्के आदिवासी व गोरगरीब बांधव वास्तव्य करणाऱ्या अंधरवाडीत ५० घरांची वस्ती आहे. त्यात २७५ ते ३00 ग्रामस्थ वास्तव्य करतात. या गावाला निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्य बहाल केले आहे. निसर्गाच्या कुशीत हे गाव वसलेले आहे. मात्र विकासाचा सूर्य या गावात अद्याप पोहोचलाच नाही. विकासाची किरणे कधी उगवलीच नाही. स्वातंत्र्याच्या तब्बल ६७ वर्षानंतरही या इवलाशा गावाला साधा रस्ता नाही़ परिणामी तेथील गावकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करीत जीवन कंठावे लागत आहे.
या गावाला धड रस्ता नसल्याने पावसाळ्यात तर ग्रामस्थ भंडावून जातात. त्यांची प्रचंड तारांबळ उडते. विशेषत: पावसाळ्यात कुणी आजारी पडल्यास त्याला दवाखान्यापर्यंत तरी नेता येईल किंवा नाही, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकतो. कारण पावसाळ्यात या गावाला असलेल्या सध्याच्या रस्त्यावर दोन ते तीन फूट चिखल साचतो. तो चिखल तुडवित ग्रामस्थांना पुढची वाट शोधावी लागते. त्यामुळे त्यांची प्रचंड परवड होते. तथापि या गावाला रस्ता तयार करण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर उदासीनताच दाखविली जाते.
या छोटाश्या गावात केवळ रस्ताच नाही, तर शाळाही नाही, पाणी पुरवठा योजनाही नाही. सर्वच बाबतीत हे गाव मागासलेले आहे. आदिवासी बांधवांसाठी शासन विविध योजना आखते. त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देते. प्रत्यक्षात हा निधी, योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे या गावावरून दिसून येते. परिणामी हा निधी, योजना कुठे जातात, असा प्रश्न निर्माण होतो. देशाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे त्यांनाही वाटते. या लहान गावाकडे कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळे तेथील ग्रामस्थ अद्यापही गावात विकासाचा सूर्य कधी उगवेल, याच विवंचनेत आहे. शासनाने किमान रस्ता द्यावा, गावात शुद्ध पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी, एवढ्याच त्यांच्या माफक अपेक्षा आहेत.
मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही कोणत्याच शासनाला त्या पूर्ण करता आल्या नाहीत. विशेष म्हणजे केळापूर-आर्णी हा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असताना गावाची फरफट सुरूच आहे.