शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बँकेला २३० कोटींचे कर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2015 00:23 IST

जिल्हाभरातील शेतकऱ्यांना विविध स्वरूपाचे कर्ज वाटणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही कर्ज घ्यावे लागले आहे. राज्य सहकारी बँकेने २३० कोटींचे कर्ज मंजूर केले आहेत.

यवतमाळ : जिल्हाभरातील शेतकऱ्यांना विविध स्वरूपाचे कर्ज वाटणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही कर्ज घ्यावे लागले आहे. राज्य सहकारी बँकेने २३० कोटींचे कर्ज मंजूर केले आहेत. राष्ट्रीयकृत बँका शासनाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. राज्याच्या मंत्री व आमदारांंना तर या बँका जुमानतही नाही. त्यांना केवळ रिझर्व्ह बँकेचेच आदेश चालतात. अशा स्थितीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहते. जिल्हा बँकेकडे कर्ज मागणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने बँकेला पैशाची तरतूद करताना अडचणी निर्माण होतात. म्हणून जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज वाटप करता यावे म्हणून स्वत: राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेते. यावर्षी जिल्हा बँकेने ३११ कोटींच्या कर्जाची मागणी राज्य बँकेकडे केली होती. मात्र बँकेला गतवर्षी एवढेच २३० कोटी रुपयांचे कर्ज राज्य बँकेने मंजूर केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षी खरीप हंगामात तब्बल ६८५ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट शासनाने ठरवून दिले आहे. आतापर्यंत यातील १४४ कोटी रुपये कर्ज वितरित झाले आहे. जून अखेरपर्यंत ३०० कोटींचे कर्ज वितरित होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ३५८ कोटी रुपये पीक कर्ज वाटप जिल्हा बँकेने केले होते. मात्र यावर्षी कर्जाची अपेक्षित वसुली न झाल्याने अनेक शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यामुळे यातील अनेक शेतकरी नव्या कर्जासाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी वितरित केलेल्या कर्जातील ७० कोटी रुपये अद्यापही जिल्हा बँकेचे वसूल होऊ शकलेले नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात पीक कर्ज उचलण्यासाठी जिल्हाभरातील शाखांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. अशा वेळी अचानक चलन तुटवडा निर्माण होतो, असा बँकेचा अनुभव आहे. हा तुटवडा टाळण्यासाठी आतापासूनच विविध बँकांकडून पुरेसे चलन उपलब्ध करून घेण्यात आले आहे. (प्रतिनिधी)