शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

टँकरद्वारे भागविल्या जातेय ग्रामस्थांची तहान

By admin | Updated: May 15, 2015 00:43 IST

वाशिम जिल्हय़ातील ११ गावांचा समावेश; १४ खासगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा.

वाशिम : जिल्हय़ात जाणवत असलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने उपाय योजना करण्यात येत आहेत. जिल्हय़ात १३ मे पर्यंत टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या गावांची संख्या १४ असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाच्यावतीने ४१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करून या विहिरींवरुन ३६ गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केल्या जात आहे तर ११ गावे व १ वाडीकरिता १४ टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्हय़ात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासाठी पाणीटंचाई आराखड्यानुसार जानेवारी २0१५ ते जून २0१५ या सहा महिन्यांमध्ये जिल्हय़ातील ४३९ गावांमध्ये ६0१ विविध उपाययोजना राबविण्याबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला होता; तसेच मंजूर आराखड्यातील प्रस्तावित १0८ गावातील १0९ विहीर खोलीकरणापैकी सर्व गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, योग्य असलेल्या ९४ गावातील ९५ अंदाजपत्रकीय प्रस्ताव मंजुरीस सादर करण्यात आले. यापैकी ५१ गावातील ५१ प्रस्ताव मंजुरीस फेरसादर करण्यात आले आहेत. जिल्हय़ातील १४ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या गावांमध्ये वाशिम तालुक्यातील माळेगाव, वाळकी जहागीर, रिसोड तालुक्यातील करंजी, मानोरा तालुक्यातील उज्ज्वल नगर, जामदरा, पारधी तांडा, खंडाळा, पाळोदी, हिवरा खु. व एक वाडीचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील यावर्डी, मालेगाव तालुक्यातील वाकद, मालेगाव जहा. या ११ गावे व १ वाडीमध्ये १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.