शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे उगवलेच नाही; तक्रारींबाबत शेतकरी मात्र उदासीन

By admin | Updated: December 3, 2014 01:41 IST

वाशिम जिल्हय़ात केवळ १0 शेतक-यांच्या तक्रारी.

नंदकिशोर नारे /वाशिम
खरीप पिकाने दगा दिल्यानंतर केलेला खर्चही हाती न आल्याने शेतकरी हवालदिल झाला. पेरलेले बियाणे उगवले नाही, यासाठी ज्या कंपनीचे बियाणे उगवले नाही त्यांच्याविरोधात तक्रार करण्याकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे कृषी विभागातील प्राप्त तक्रारीच्या आकडेवारीवरून दिसून येते.
पेरलेले बियाणे न उगवल्यामुळे जिल्हय़ातील मानोरा तालुक्यातील एका, रिसोड तालुक्यातील ४ तर वाशिम तालुक्यातील ५ अशा जिल्हय़ातील १0 शेतकर्‍यांनी बियाणे कंपन्याविरूद्ध नुकसान भरपाईची मागणी केली होती. यामधील मानोरा तालुक्यातील एका शेतकर्‍याने तीन कंपन्यांविरूद्ध तक्रार दाखल केली होती. यामध्ये कंपनीने तक्रारकर्त्या शेतकर्‍याला नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले होते; मात्र ते देत असलेली नुकसान भरपाई सदर शेतकर्‍याला पटली नसल्याने ते अमान्य केली होती; तसेच वाशिम तालुक्यातील ५ शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारींपेैकी एका शेतकर्‍याला बियाणे कंपनीने नुकसान भरपाई दिल्यामुळे त्यांनी तक्रार मागे घेतली होती.
यावर्षी अनेक कंपनीचे बियाणे उगविले नाही म्हणून व पावसाने दगा दिल्याने शेतकर्‍यांना अनेक ठिकाणी दुबार, तिबार पेरणी करावी लागली. पावसामुळे पिके न आल्याने शेतकर्‍यांना मदत मिळणे अपेक्षित होते; मात्र यापासून अनेक शेतकरी वंचित आहेत. बियाणे उगविले नाही ही नैसर्गिक आपत्ती होऊ शकत नाही म्हणून याबाबत कोणत्याच प्रकारची मदतीची उपाय योजना कृषी विभागाकडून राबविण्यात आली नाही. त्यांनी शेतकर्‍यांच्या तक्रारी घेऊन संबंधित बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अमरावती विभागात ३ हजार ६५0 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत १ हजार ५११ शेतकर्‍यांनी तक्रारी केल्यात, त्यामध्ये वाशिम जिल्हय़ातील केवळ १0 तक्रारींचा समावेश आहे.