शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

केबल टाकताना फुटली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 6:23 PM

वाशिम : परराज्यातील ‘जेसीबी’व्दारे भुमिगत ‘केबल’ टाकण्याचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली. यामुळे वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परराज्यातील ‘जेसीबी’व्दारे भुमिगत ‘केबल’ टाकण्याचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली. यामुळे वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. दरम्यान, ‘जेसीबी’वर असलेल्या मजूरांना मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषा कळत नसल्याने नेमक्या कुठल्या कंपनीकडून केबल टाकण्याचे काम सुरू आहे, याचा पत्ता लागत नसल्याने कारवाई करताना अडचण निर्माण झाली आहे. याप्रकरणी जऊळका पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.के. जीवने यांनी दिली.वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सद्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ताब्यात आहेत. याअंतर्गत १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, कुठल्यातरी कंपनीने भुमिगत ‘आॅप्टीकल फायबर केबल’ टाकत असताना ते चक्क पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनमधून टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे ठिकठिकाणी पाईपलाईन फुटल्याने संबंधित चौदाही गावांना होणारा पाणीपुरवठा प्रभावित झाला. यामुळे गावकºयांना कृत्रीम तथा भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, पाईपलाईल फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता जीवने यांच्यासह त्यांच्या चमुने बाधीत झालेल्या ठिकाणांना भेटी देवून पाईपलाईन जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बºयाच लांबपर्यंत पाईपलाईन फुटलेली असल्याने संपूर्ण दुरूस्ती करण्यास बराच कालावधी लागणार असल्याचे जीवने यांनी सांगितले.  ‘जेसीबी’ मालकाचाही पत्ता लागेना!पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फोडून १४ गावांचा पाणीपुरवठा प्रभावित करण्यास कारणीभूत ठरलेल्या कंपनीसोबतच ‘जेसीबी’च्या मालकाचाही पत्ता लागेनासा झाला आहे. ‘जेसीबी’वर असलेल्या एच. ३० एझेड ००९८ या क्रमांकाची आॅनलाईन चौकशी केल्यानंतर ‘डिटेल्स नॉट फाऊंड’चा संदेश येत असल्याचे मजिप्राचे कार्यकारी अभियंता के.के. जीवने यांनी सांगितले. त्यामुळे हा जेसीबी नेमका कुणाचा, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अद्याप पत्ता न लागलेल्या कंपनीच्या ‘जेसीबी’ने बेकायदेशीररित्या खोदकाम करून पाणीपुरवठा योजनांची पाईपलाईन फोडले. यामुळे वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याप्रकरणी जऊळका पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून दोषी कंपनीचा शोध घेणे सुरू आहे. संबंधित गावांमधील नागरिकांनीही याकामी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सहकार्य करणे अपेक्षित आहे.- के.के. जीवने, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई