शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर ! अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 19:52 IST

शिवसेना, भाजपा या पक्षाची युती होणार की नाही हे अद्याप अस्पष्ट असल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी मुंबईवारी सुरू ठेवली आहे.

- संतोष वानखडे

वाशिम : आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच रिसोड विधानसभा मतदारसंघात वातावरण तापत असून, काँग्रेसचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अनंतराव देशमुख यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

पूर्वाश्रमीचा मेडशी विधानसभा मतदारसंघ आणि २००९ मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात १९९९ आणि २००४ चा अपवाद वगळता उर्वरीत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने राजकीय समिकरणेही बदलली आहेत. काँग्रेससह भाजपामध्येही गटबाजी असल्याने या गटबाजीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न शिवसेना, शिवसंग्राम या पक्षाकडून होत असल्याचे दिसून येते.

शिवसेना, भाजपा या पक्षाची युती होणार की नाही हे अद्याप अस्पष्ट असल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी मुंबईवारी सुरू ठेवली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून विद्यमान आमदारांचे तिकट निश्चित मानले जात असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंतराव देशमुख कोणती भूमिका घेतात, यावर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. अनंतराव देशमुख यांनी पूत्र नकुल यांच्यासाठी समर्थकांचा मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी केली होती. त्यांनी आपला निर्णय राखून ठेवल्याने काँग्रेसच्या गोटात तुर्तास तरी अस्वस्थता असल्याचे दिसून येते.

दुसरीकडे अंतर्गत गटबाजीवर तोंडसुख घेत भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडी जवळ केली आहे. सोबतच राकॉचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी देखील वंचित आघाडीची वाट धरल्याने चुरस निर्माण झाली. सेना, भाजपा व शिवसंग्राम या तिनही पक्षाच्या इच्छूकांनी रिसोड मतदारसंघावर दावा ठोकल्याने तिढा वाढला आहे. सेना, भाजपा युती संदर्भात वरिष्ठ स्तरावर ठोस भूमिका नसल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छूकांनी मोचेर्बांधणीला वेग दिला आहे. त्यातच शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दोन वेळा भेटी देऊन रिसोड मतदारसंघातील राजकीय वातावरण तापविले आहे.

युतीत हा मतदारसंघ कुणाला सुटतो आणि उमेदवार कोण राहिल यावर लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे. एकंदरित काँग्रेसचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी विरोधकांनी कंबर कसल्याने आणि त्यात वंचित आघाडीने वातावरण निर्मिती केल्याने काँग्रेससमोर तगडे आव्हान निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसनेदेखील परंपरागत मतदार टिकवून ठेवण्याबरोबरच अन्य मतदारांना पक्षाशी जोडण्याचे प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. विरोधकांनी निर्माण केलेल्या या आव्हानांवर मात करण्यासाठी कॉंग्रेसला मतदारांची कितपत साथ मिळते, यावर या बालेकिल्ल्याचे भवितव्य अवलंबून आहे.

टॅग्स :washimवाशिमcongressकाँग्रेस