मॉर्निंग वॉकला गेलेल्या तिघांना भरधाव कारनं चिरडलं
By Admin | Updated: September 19, 2016 11:15 IST2016-09-19T11:15:45+5:302016-09-19T11:15:45+5:30
वाशिम जिल्ह्यातल्या सवड गावात भरगाव वेगात असणाऱ्या गाडीने उडवल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तिघांना भरधाव कारनं चिरडलं
>ऑनलाइन लोकमत
रिसोड (वाशिम), दि. १९ - वाशिम जिल्ह्यातल्या सवड गावात भरगाव वेगात असणाऱ्या गाडीनं तीन मुलांना उडवलं. या भीषण अपघातात तीनही मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
वैभव वाकळे, अंकित जाधव, करण खांदळे हे तिघेजण मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. रिसोड-वाशिम महामार्गावर असताना त्यांना वाहनानं उडवलं. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे.
आज पहिल्यांदाच हे तिघेही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले होते. त्याचवेळी वाशिमहून येणाऱ्या एका भरधाव इनोव्हा कारनं या तिघांना उडवलं ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कारचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.