शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव

By admin | Updated: August 21, 2014 00:31 IST

विविध सोयीसुविधांच्या अभावामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.

वाशिम: जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, विविध सोयीसुविधांच्या अभावामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. संबधितांनी याक डे लक्ष देऊन त्वरीत साफसफाई करावी आणि रुग्णांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी बंजारा क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही मागणी त्वरीत पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. वाशिमला जिल्हय़ाचा दर्जा प्राप्त झाला खरा; परंतु विकासाच्या बाबतीत अतिशय मागे राहिल्यामुळे राज्यातील अतिमागास जिल्हा म्हणून वाशिमचे नाव घेतले जाऊ लागले. जिल्हय़ात आवश्यक असलेली काही मुख्यालये येथे तयार करण्यात आली. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाचाही समावेश आहे. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी आवश्यक अनेक सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. काही दिवस येथे बर्‍यापैकी कारभार चालला; परंतु गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात अव्यवस्थेने क ळस गाठला आहे. मुबलक प्रमाणात औषधी पुरवठा, वैद्यकीय, अधिकारी, कर्मचार्‍यांची परेशी संख्या असतानाही रुग्णांवर काळजीने उपचार केले जात नाहीत. येथे येणार्‍या रुग्णांवर थातूरमातूर उपचार करून त्याला लगेचच अकोला येथे हलविण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे 'रेफर टू अकोला' या नावानेच जिल्हा रूग्णालय ओळखले जाऊ लागले. या रुग्णालयाच्या आवारासह आतमध्येही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रसाधनगृहांची अनेक दिवसांपासून साफ सफाई झालेली नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे.परिसरात सर्वत्र गाजर गवत वाढल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, या डासांमुळे रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांनाही आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. चांगल्या प्रकारचे वैद्यकीय अधिकारी त्यांच्या प्रेमळ स्वभावानेच रुग्णांचा अर्धा आजार बरा करतात; परंतु वाशिमच्या जिल्हा रुग्णालयात नाही. या रुग्णालयातील अव्यवस्थेविषयी अनेक वेळा चर्चा झाली; परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. संबंधित अधिकार्‍यांनी या प्रकाराची दखल घेऊन रुग्णालयात साफसफाई अभियान राबवावे आणि रूग्णांची होत असलेली हेळसांड थांबविण्यात यावी, अशी मागणी बंजारा क्र ांती दल महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही मागणी त्वरीत पूर्ण न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर बंजारा क्र ांती दल महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, देवराज राठोड, प्रा. अनिल चव्हाण, तालुकाध्यक्ष किशोर राठोड, उपतालुकाध्यक्ष लोकेश चव्हाण, शांताराम पवार, गोपीचंद चव्हाण, संजिव जाधव, जीवन राठोड, विनोद राठोड, अशोक चव्हाण, मोहन महाराज आदिंची स्वाक्षरी आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांकडेही पाठविण्यात आली आहे.