शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

जलशक्ती अभियानातून अतिरिक्त सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 3:37 PM

१ कोटी ४३ लाख रुपये खर्च करून केलेल्या पुनर्भरण क्षमतेच्या कामामुळे जवळपास १ लाख लिटर पाण्याची साठवणूक झाली आहे तसेच या उपक्रमांतर्गत ७४४८ वृक्षलागवड पुर्ण करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम : महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफार्मेशन फाऊंडेशन, युनिसेफ इंडिया आणि भारत सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत राबविलेल्या जलशक्ती अभियानात जिल्हयातील १० गावांचा समावेश असून, या गावांमध्ये १ कोटी ४३ लाख रुपये खर्च करून केलेल्या पुनर्भरण क्षमतेच्या कामामुळे जवळपास १ लाख लिटर पाण्याची साठवणूक झाली आहे तसेच या उपक्रमांतर्गत ७४४८ वृक्षलागवड पुर्ण करण्यात आली.या अभियानात जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील वाई, किनखेड, वढवी, लोहारा, किसाननगर, शेवती, मांडवा तसेच मालेगाव तालुक्यातील कवरदरी, वाडीरामराव व पिंपळशेंडा या गावांचा समावेश करण्यात आला आहे. पेयजल आणि आरोग्य विभागाने जलशक्ती अभियान ही मोहिम आखून राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये २० गटांची निवड केली होती. यात वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा ८ जुलै २०१९ 9 ते १५ सप्टेंबर २०१९ असा होता. दुसरा टप्पा १ आॅक्टोबर रोजी सुरू झाला आणि ३० नोव्हेंबर २०१९ रोजी समाप्त झाला. या कालावधीत जिल्ह्यातील १० गावांमधून युनिसेफच्या तांत्रिक साह्याने जलशक्ती अभियान राबविण्यात आले. अभियान कालावधीत जमिनीत पाणी जिरविण्यासाठी खड्डे खोदणे, विहिरीमधील गाळ काढणे, शॉक पिट, रुफटॉप रेन वॉटर, पब्लीक वॉल रिचार्ज शॉफ्ट, नाला अशी जलसंधारणाची कामे करण्यात आली. वनीकरणाची कामे, व्हीएसटीएफ प्रकल्पातील १० गावात प्रभावीपणे राबविण्यात आली. या कामांमुळे जवळपास १ लाख लिटर पाण्याची साठवण करण्यात आल्याचा दावा यंत्रणेला केला. या पाण्याचा लाभ १९५२ कुटुंबांना होणार असून यात ६०६६ महिला तर ५५३ बालकांनाही होणार आहे. जल शक्ती अभियानामध्ये केलेले नियोजन, क्षमता निर्मितीसाठीचे प्रयत्न, अंमलात आणलेल्या प्रक्रिया, भागीदारी, तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर या सर्व घटकांमुळे यश अधोरेखीत झाले आहे. ग्रामीण भागात सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी स्थानिक रहिवाशांचा सहभाग आणि पंचायती राज्ज पद्धती अधिक मजबूत व्हावी यासाठीची कार्यपद्धती कौतुकास्पद असून या सर्व गोष्टींचे अनुकरण जिल्ह्याच्या इतर भागात करून तेथेही पाणी सुरक्षेसाठी प्रयत्न करता येतील, असे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक म्हणाले.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार