शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रक व लक्झरी बसची धडक; तीन जन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 5:47 PM

किन्हीराजा :- लक्झरी व ट्रकच्या समोरासमोर झालेल्या अपघातात लक्झरीचे चालक व वाहकासह ट्रकचा चालक मिळून तिघे गंभीर झाले.

ठळक मुद्दे ही घटना औरंगाबाद-नागपूर महामार्गावर बुधवारी सकाळी २.३० वाजता किन्हीराजा पासून तीन कीलोमीटर अंतरावर घडली.  या अपघातामुळे रात्री ३ वाजतापासून सकाळी ९ वाजेपर्यन्त या मार्गावरील वाहतुक बंद होती. या अपघातात लक्झरीचा चालक गज्जफ्फर खान (४८), राजू शिंदे (४०), रा.  दोघेही रा. औरंगाबाद हे गंभीर जखमी झाले असून, ट्रकचा चालक जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क 

किन्हीराजा :- लक्झरी व ट्रकच्या समोरासमोर झालेल्या अपघातात लक्झरीचे चालक व वाहकासह ट्रकचा चालक मिळून तिघे गंभीर झाले. ही घटना औरंगाबाद-नागपूर महामार्गावर बुधवारी सकाळी २.३० वाजता किन्हीराजा पासून तीन कीलोमीटर अंतरावर घडली.  या अपघातामुळे रात्री ३ वाजतापासून सकाळी ९ वाजेपर्यन्त या मार्गावरील वाहतुक बंद होती. त्यामुळे वाहनांची दोन्ही बाजूंनी ५ कीलोमीटर पर्यंत रांग लागली होती.शेवटी पोलीस व इतरही वाहनचालकांनी ट्रक बाजूला सारुन वाहतूक सुरु केली.

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर मंगळवार २६ जून रोजी रात्री किन्हीराजा ते मालेगाव रोडवरील खोकड तलाव शिवारातून एम एच २० डीडी ८०८ क्रमांकाची लक्झरी बस  मालेगावमार्गे नागपूरकडे जात होती, जीजी ०७ आरडी ६४१४ क्रमांकाचा ट्रक मालेगावकडून भरधाव वेगाने किन्हीराजाकडे येत होता. त्याचवेळी खोकडतलाव शिवारात बिघाड झालेला ट्रक ओडी ११एफ ७२३७ क्रमांकाचाा ट्रक उभा होता. हा ट्रक उभा आहे की मार्गावर धावत आहे. याचा अंदाज आला नाही व प्रत्यक्ष ट्रकजवळ पोहोचल्यानंतर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात जीजी ०७ आरडी ६४१४ क्रमांकाचा ट्रक व लक्झरीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात लक्झरीचा चालक गज्जफ्फर खान (४८), राजू शिंदे (४०), रा.  दोघेही रा. औरंगाबाद हे गंभीर जखमी झाले असून, ट्रकचा चालक जखमी झाला. या अपघातामुळे ३ वाजतापासून ते सकाळी ९ वाजेपर्यंत तब्बल सहा तास औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार किरणकुमार साळवे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळ गाठून जमादार संतोष कोहर  ज्ञानेश्वर राठोड यांच्यासह वाहतूकशाखा जऊळकाचे पोलीस व जमा झालेल्या वाहनांचे चालक व वाहकाने ट्रकला लोटून बाजूला केले व वाहतूक सुरळीत केली

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात