शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

१.७८ लाख शेतकर्‍यांना पीक विम्याचा आधार!

By admin | Updated: June 12, 2016 02:52 IST

वाशिम जिल्ह्यासाठी ६९ कोटी ४८ लाख रुपये मंजूर : अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा

दादाराव गायकवाड /वाशिम
मागील ३ वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना पीक विम्याचा आधार मिळणार असून, राज्य शासनाच्यचा पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार ८५३ शेतकर्‍यांना मागील खरीप हंगामासाठी ६९ कोटी ४८ लाख रुपये पीक विमा मंजूर झाला आहे.
मागील वर्षी अर्थात २0१५ च्या खरीप हंगामात पावसाच्या हुलकावणीमुळे तब्बल एक महिना उशिरा पेरणी झाली. अनियमित पावसामुळे व उशिरा झालेल्या पेरणीमुळे होणार्‍या पीक नुकसानीची भरपाई मिळावी, याकरिता जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला. या योजनेचा विमा काढण्याची मुदत सुरुवातीला ३१ जुलैपर्यत होती. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त शेतकर्‍यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी होता आले. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकर्‍यांनी पीक विमा काढण्याला प्राधान्य दिले.
जिल्ह्यातील ३ लाख १ हजार ४८३ शेतकर्‍यांनी २ लाख ११ हजार ९३0 हेक्टर
क्षेत्रासाठी ३९२ कोटी ५१ लाख रुपयांचा पीक विमा उतरविला होता. या विम्यासाठी २0 कोटी ३१ लाख रुपयांची रक्कम विमा हप्ता म्हणून भरण्यात आली होती. आता ३ लाख १ हजार ४८३ शेतकर्‍यांपैकी त्यापैकी सुमारे १ लाख ७८ हजार ८५३ शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले असून, विम्यापोटी त्यांना ६९ कोटी ४८ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
मागील खरीप हंगामातील विम्यापोटी ही रक्कम मिळणार आहे. पीक विम्याची रक्कम मिळाल्याने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना आगामी खरीप पेरणीसाठी बियाणे-खत खरेदीसाठी मदत होणार आहे. पावसाच्या लहरीपणामुळे दरवर्षी उत्पादनात होणारी घट पाहता, अनेक शेतकरी खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांचा पीक विमा उतरवितात. तूर, मूग, उडिद, सोयाबीन, कापूस या खरिपातील पिकांसाठी जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधून ३ लाख १ हजार ४८३ शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला. यापैकी १ लाख ७८ हजार ८५३ शेतकर्‍यांचाच पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे १ लाख २२ हजार ३३८ शेतकर्‍यांना पीक विम्याच्या मोबदल्यात कोणतीही मदत मिळाली नसल्याचे सद्यस्थितीत स्पष्ट होत आहे. पीक विमा देताना गत पाच वर्षातील उंबरठा उत्पन्न आणि मंडळनिहाय निकषांमुळे १ लाखाहून अधिक शेतकर्‍यांना फटका बसला. यापुढे शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यामुळे संबंधित योजनेबाबत शेतकर्‍यांना पूर्ण मार्गदर्शन करण्याची गरज आहे.