शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते आठवीचे १.२५ लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास १४७७५ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री गायकवाड ...

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी केली आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे आपण ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आपण विविध माध्यमातून प्रयत्न करत होतो. पण आता कोरोनाची परिस्थिती पाहता आता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यातील पहिली ते पाचवी पर्यंतचे ७३ हजार ७७५, तर सहावी ते आठवीपर्यंत ५१ हजार ९१२ विद्यार्थी मिळून एकूण १ लाख २५ हजार ६८७ विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत, आरटीईच्या अंतर्गत म्हणजे मोफत शिक्षण अधिकाराच्या कायद्यांतर्गत, खरेतर या मुलांचे वर्षभराचे मूल्यमापन बघितले पाहिजे, परंतु यंदाची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यामुळे यंदा हे होणे शक्य नाही. म्हणून पहिली ते आठवी इयत्तेमधील विद्यार्थी आहेत, शिक्षण हक्क अधिकाराच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील इयत्तेत पाठवण्यात येत असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

------------------------

जिल्ह्यातील विद्यार्थी

वर्ग - विद्यार्थी संख्या

पहिली --------------- १४८८५

दुसरी --------------- १४६६५

तिसरी --------------- १४७३०

चौथी --------------- १४७२०

पाचवी --------------- १४७७५

सहावी --------------- १७३०४

सातवी --------------- १७०००

आठवी --------------- १७६०८

---------------

कोट : गेल्या वर्षभरापासून आमचा पाल्य ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवीत आहे. शाळेतून दिला जाणारा अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर त्याने नियमित भर दिला. आता परीक्षा तोंडावर असताना शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास करून पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. कोरोना पार्श्वभूमीवर हा निर्णय समाधानकारक वाटतो.

-संगीता गायकवाड, महिला पालक

----------------

कोट : कोरोना संसर्गामुळे वर्षभर ऑनलाईन शिक्षणावर शिक्षण विभागाने भर दिला. त्यात आमचा पाल्य सहाव्या वर्गात असताना त्याने शिक्षकांनी दिलेला गृहपाठ नियमित पूर्ण केला. ऑनलाईन क्लास केले. आता परीक्षेसाठी त्याची तयारी झाली असताना शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचे ठरविले. हा निर्णय चांगला असला तरी ऑनलाईन परीक्षा घ्यायला हव्या होत्या.

-गणेश ठाकरे, पालक

-------------

कोट : आमचा पाल्य पाचवीत असून, तो वर्षभरापासून ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवित आहे. शाळेतून दिलेला अभ्यासक्रम त्याने पूर्ण करण्यावर भर दिला. आता शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास करून पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चांगला असला तरी विद्यार्थ्यांची प्रगती नेमकी कळणार नाही. त्याचे मूल्यमापन होणार नाही.

- सारिका पवार, महिला पालक

----------------

कोट : शालेय शिक्षण विभागाचा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय पूर्णपणे योग्य आहे असे म्हणता येणार नाही. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षा घेणे योग्य नसले तरी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या, तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापन होऊ शकेल, परंतु परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय म्हणजे पुढे विद्यार्थी आळशी बनून त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटू शकते.

-अरुण इंगळे, माजी प्राचार्य

-----------------

कोट : शिक्षण विभागाचा निर्णय वरकरणी चांगला दिसतो, परंतु हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मारक आहे. विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करीत असताना त्याचे नेमके काय परिणाम झाले, ऑनलाईन अभ्यास करताना त्यांना अभ्यासक्रमात काही अडचणी आल्या का, त्यांचा पाठ्यक्रम पूर्ण झाला आहे का, हे पुढच्या वर्गात विना परीक्षा प्रवेश दिल्याने कळणार नाही. त्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी पर्यायाचा विचार करायला हवा.

-बाळासाहेब दहातोंडे,

माजी गटशिक्षणाधिकारी