शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

डोळ्यांत आणि शेतात पाणी, मदत तरी कुणाची घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 11:32 PM

मदत तरी कुणाची घेणार : घरासाठी पौष्टिक धान्य मिळणार नाही

भातसानगर : हातचे भातपीक पावसाने नेले, आता मदत तरी कुणाची घेऊ, अशी अवस्था शहापूर तालुक्यातील कानवे येथील हुसेन आदम शेख या शेतकऱ्याची झाली आहे. या शेतकºयाची पूर्ण भातशेती आज पाण्यात गेली आहे. त्यामुळे आता वर्षभरासाठी ठेवले जाणारे घरचे पौष्टिक धान्य मिळणार नसल्याचे दु:ख त्यांच्या चेहºयावर दिसत आहे.

कानवे येथे राहणाºया या शेतकºयाच्या उभ्या आयुष्यात अशा प्रकारचे संकट कधीच आले नाही. केवळ, पावसाच्या पाण्यावर वर्षभरातून एकदाच भातपीक घेतले जाते. याच एकमेव पिकावर त्यांचे वर्ष अवलंबून असते. या दोन एकर चार गुंठे शेतीत ४० ते ५० पोती भात पिकेल. त्यापैकी निम्मा भात बाजारात विकायचा. या विकल्या गेलेल्या भातपिकातून मिळणारे पैसे आपल्या कुटुंबासाठी ठेवायचे. उर्वरित धान्य आपल्या कुटुंबाला वर्षभर पुरेल, या अंदाजाने ते घरात ठेवायचे, हा त्यांचा दरवर्षाचा नित्यक्र म आहे. या वर्षी मात्र हे सारे अंदाज पावसाने धुळीस मिळाल्याने वर्षभर त्यांना बाजारातून धान्य विकत घ्यावे लागणार तर आहेच, पण त्या धान्यामध्ये ती पौष्टिकता मिळणार नसल्याची खंत त्यांच्या जिव्हारी लागली आहे. दरवर्षी ते आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने शेती करतात, त्यामुळे दर्जेदार तांदळाचे दाणे त्यांना खायला मिळत होते. मात्र, यावर्षी या तांदळाला त्यांना मुकावे लागणार आहे. कधी नव्हे ती स्थिती आज या कुटुंबाची झाली आहे. आज लावलेली भातशेती, बहरलेली भातपिके तुडुंब भरलेल्या शेतातील पाण्यात बुडाल्याची स्थिती उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.वर्षभर तांदळाची समस्या भेडसावणारचार मुले, पत्नी असा त्यांचा परिवार आहे. त्यांचा दुसरा व्यवसाय नसल्याने त्यांच्यासाठी पाण्यात गेलेले भातपीक हे फार मोठे संकट असल्याने त्यांच्यासाठी आता वर्षभर तांदळाची समस्या निर्माण होणार आहे. केवळ याच पिकावर त्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालत असल्याने आता पुढे कसे होणार, हा गंभीर प्रश्न या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी