शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडला ४ महिने मुख्याधिकारीच नाही

By admin | Updated: May 22, 2017 01:48 IST

नगरपंचायतीचा कारभार जानेवारीमध्ये मुख्याधिकारी डॉ़ धीरज चव्हाण यांच्या काळात सुरु झाला खरा मात्र ते रोज येणारे मोर्चे, आंदोलने, नागरिकांकडून मिळणाऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्क विक्रमगड : नगरपंचायतीचा कारभार जानेवारीमध्ये मुख्याधिकारी डॉ़ धीरज चव्हाण यांच्या काळात सुरु झाला खरा मात्र ते रोज येणारे मोर्चे, आंदोलने, नागरिकांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीला कंटाळून रजेवर गेल्याने चार महिन्यांपासून या नगरपंचायतीला कुणीही वाली नाही.मुख्याधिकाऱ्यांविनाच कारभार चालविला जात आहे़ याबाबत ग्रामस्थांनी टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर शासनाकडुन तात्पुरत्या स्वरुपात पालघर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे या पदाचा चार्ज सोपविण्यात आला होता मात्र ते देखील त्यांची कामे सोडून येथे येण्यास तयार नसल्याने आता हा कार्यभार जव्हार नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचे समजते मात्र त्यांचाही येथे अजून थांगपत्ता नसल्याने नागरिकांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत आहे़ थोडयाच दिवसांत शाळा सुरु होणार असल्याने त्यासाठी विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता भासणार आहे़ मात्र या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास कुणासही वेळ नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे़विक्रमगड नगरपंचायतीची लोकसंख्या ८ हजार ३४० असून १७ गाव-पाडयांचा समावेश आहे़ या सर्व पंचक्रोशिचा संपूर्ण कारभार हा याच नगरपंचायतीमार्फत चालतो १५ कर्मचाऱ्यांची पदे न भरताच कारभार सुरु करण्यांत आल्याने विकासकामांना गती कशी येणार असा सवाल उपस्थित केला जात असतांनाच आता मुख्याधिकारी देखील गायब झाल्याने नगरपंचायतीचा पुरता बोजवारा उडालेला आहे़विदयार्थ्यांना विविध कामांसाठी तसेच शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असलेले महत्वाचे दाखल, घरपटटी, अ‍ॅसेसमेन्ट उतारा, व इतर कागदपत्रे मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे़ त्यातच येथील गावपाडयांत केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत हगणदारी मुक्त गाव योजनेतून शौचालये बांधण्याचे काम जोमाने सुरु असून त्यासाठी लागणा-या धनादेशांवर मुख्याधिकाऱ्यांची सही आवश्यक असते, त्यामुळे ही कामे देखील रखडलेली आहेत़ शासनाने ग्रामपंचायत असताना असलेला कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरून व नगरपंचायतीला आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती करून मगच नगरपंचायतींची स्थापना करणे आवश्यक होते. परंतु ते न करताच नगरपंचायत स्थापन केल्याने ढाँचा बदलण्यापलीकडे काहीही साध्य झालेले नाही.नगरपंचायतीकरीता शासन मान्य मंजूर पदांचा तपशिलनगरपंचायतीची एकंदरीत लोकसंख्या आजच्या घडीला १० हजारापर्यत आहे़ या लोकसंखेकरीता आधारावर नगरपंचायतीमधील गाव पाडयांच्या नियोजन विकास कामांच्यासाठी शासनमान्य मंजूर पदांचामध्ये १) सहायक कार्यालय अधिक्षक, २)सहायक मालमत्ता पर्यवेक्षक, ३)सहायक सार्वजनिक बांधकाम अभियंता, ४)सहायक पाणीपुरवठा अभियंता, ५)सहायक नगररचनाकार, ६)सहायक समाजकल्याण व माहिती जनसंपर्क अधिकारी, ७)करनिरिक्षक, ८)लेखापाल, ९)लिपिंक टंकलेखक, १०)गाळणी चालक, वीजतंत्री जोडारी, ११)पंप आॅपरेटर, वीजतंत्री जोडारी, १२)शिपाई, १३) मुकादम, १४) व्हालमन, १५)स्वच्छता निरिक्षक़ अशी एकुण मुख्याधिकारी सोडून १५ पदांपैकी एकही पदे भरलेले नाही़