शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा वनजमिनीवर करणार चार लाख वृक्षांची लागवड

By admin | Updated: May 20, 2014 01:57 IST

महानगरपालिका प्रशासनातर्फे नागरी वनीकरण व वनजमिनीवर सामाजिक वनीकरण कार्यक्रमाअंतर्गत ४ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे

दीपक मोहिते , वसई - विरार शहर महानगरपालिकेतर्फे पावसाळी हंगामामध्ये महानगरपालिका प्रशासनातर्फे नागरी वनीकरण व वनजमिनीवर सामाजिक वनीकरण कार्यक्रमाअंतर्गत ४ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने यंदा पर्यावरणदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ५ जून या पर्यावरणदिनी महानगरपालिकेतर्फे सामाजिक वनीकरण कार्यक्रमाअंतर्गत ४ लाख रोपे लागवड करण्यात येणार आहेत. या दिवशी सकाळी ८ वा. महानगरपालिका मुख्यालयापासून वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. १९८० च्या दशकात वसई-विरार उपप्रदेशात नागरीकरणाला वेग येऊन बांधकाम व्यवसाय फोफावला. बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामे करताना वृक्षसंपदेवर मोठ्या प्रमाणात घाला घातला. समुद्रकिनारी असलेल्या गावामध्ये बागायती मोठ्या प्रमाणात होती परंतु तिचे क्षेत्र आता कमी होत चालले आहे. उपप्रदेशाच्या पुर्व भागात अनधिकृत बांधकामांनाही वेग आल्यामुळे तुंगारेश्वर डोंगरासारखे हिरवेगार डोंगरही आता उजाड झालेले पहावयास मिळतात. वसई-विरार नालासोपारा या तीन शहराच्या पूर्वेस प्रचंड प्रमाणात वृक्षहानी झाली. हे लोण ग्रामीण भागातही पसरत गेले व उपप्रदेशात पर्यावरणाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रथम महापौर राजीव पाटील यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याची संकल्पना प्रशासनासमोर मांडली व ती सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामी प्रशासनाला तत्कालीन वनसंरक्षकाचेही पूर्ण सहकार्य लाभले. ५ जून २०१४ सकाळी ९ वा. जीवदानी मंदिर पायथ्याशी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी पर्यावरण विषयावर खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून पर्यावरण या विषयावर २४ बाय १८ इंच आकाराच्या ड्रॉइंग पेपरवर आपल्या कलेचे चित्र साकारण्याची संधी सहभागी होणार्‍या चित्रकारांना देण्यात येणार आहे. विजेत्यांना प्रथम पारितोषिक - ५ हजार, द्वितीय पारितोषिक - ३ हजार, तृतीय पारितोषिक - २ हजार व उत्तेजनार्थ - १ हजार रू. ची दोन अशी दोन पारितोषिके देण्यात येणार आहेत. या उपक्रमात नागरिक व चित्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौर नारायण मानकर, माजी महापौर राजीव पाटील व महानगरपालिकेचे आयुक्त गोविंद राठोड यांनी केले आहे. काही भागात वृक्षाची लागवड करण्यात आली व आता ही मोहिम अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. येणार्‍या काळात महानगरपालिका प्रशासनातर्फे दरवर्षी लाखो रोपांची लागवड करण्याचा मानस जाहीर करण्यात आला आहे.