शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : उद्धव ठाकरेंची सगळी आश्वासने हवेतच विरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 05:28 IST

- हितेन नाईक पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मच्छीमारांना दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन ...

- हितेन नाईकपालघर : पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मच्छीमारांना दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण झाले नसून उलट त्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत जाऊ लागल्याने मच्छीमार मतदारांचा अपेक्षाभंग होऊ लागला आहे. त्याचे उलटे परिणाम या विधानसभा निवडणुकीत दिसून येत सेनेचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पालघर विधानसभेत शिवसेना उमेदवारांच्या पारड्यात हजारो मतांचे दान टाकून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण करून देण्यात डहाणू ते केळवे दरम्यानच्या धाकटी डहाणू, गुंगवाडा, वरोर, चिंचणी, घिवली, काम्बोडे, तारापूर, नवापूर, उच्छेळी, दांडी, आलेवाडी, खारेकुरण, मुरबे, सातपाटी, शिरगाव, वडराई, माहीम, केळवे आदी किनारपट्टी भागातील मच्छीमार समाजाचा मोठा वाटा राहिला आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागाकडे सेनेच्या वरिष्ठांनी केलेल्या दुर्लक्षामुळे या सेनेच्या बालेकिल्ल्याला भाजपने भगदाडे पाडायला सुरुवात केली. लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले असताना शिवसेनेला १६ हजार २४३ मते तर भाजपच्या उमेदवाराला २० हजार ३४३ मते पडली होती. शिवसेनेपेक्षा भाजपने ४ हजार १०० मते जास्त घेत सेनेवर वर्चस्व मिळविले.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पालघरमध्ये आलेल्या शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मच्छीमार पदाधिकाऱ्यांनी पालघरच्या ठाणे जिल्हा मच्छीमार संघाच्या कार्यालयात भेट घेऊन डिझेल परताव्याची कोट्यवधी रुपयांची वर्षभरापासून थकीत असलेली रक्कम मिळावी, मच्छीमारांच्या राहत्या घरांच्या जमिनीचे सातबारे मिळावेत, मच्छी विक्र ेत्या महिलांना मच्छीमार्केटची व्यवस्था करून द्यावी, समुद्रात वाढत चाललेल्या अतिक्रमणावर निर्बंध घालावेत, पर्ससीन मासेमारीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, एनसीडीसीचे अतिरिक्त व्याज माफ करावे, ओएनजीसी सर्वेक्षण नुकसान भरपाई मिळणे आदी प्रलंबित प्रश्नावर उपाय योजना आखून प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली होती. तीवर सकारात्मक विचार करून डिझेल परताव्याची रक्कम देणे, जमिनींना सातबारा देणे आणि पालघरमधील मासे विक्र ेत्या महिलांना मार्केटसाठी जागा उपलब्ध करून देणे, ओएनजीसी भरपाई मिळवून द्यावी या बाबीवर तत्काळ कार्यवाही करू, असे आश्वासन देऊन तुमच्या मागण्यांना न्याय दिल्याशिवाय मी अजिबात स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास दिला होता. मात्र, लोकसभा निवडणूक होऊन ६ महिन्याचा कालावधी लोटला असून एकही आश्वासनाची पूर्तता अजून झालेली नाही. त्यामुळे ही आश्वासने हवेतच विरली असून सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थांचा वर्षभरापासूनच्या डिझेल परताव्याची थकीत रक्कम दीड ते दोन कोटीच्या घरात पोचल्याने त्या संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.ओएनजीसी भरपाई, जमिनींना सातबारा देणे आदीबाबत चकार शब्द काढला जात नाही, तर पालघरमधील मासे विक्र ेत्या महिलांना मनोरच्या रस्त्यावरून उचलून पूर्वेकडील निर्जन भागात नेऊन बसविण्याच्या हालचाली सेनेची सत्ता असलेल्या नगरपरिषदेकडून सुरू झाल्या आहेत.शिवसेनेने आम्हाला दिले काय?शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, आ.रवींद्र फाटक निवडणुकी दरम्यान येऊन मतदारांना आश्वासने देऊन सत्ता संपादन करून निघून जातात, मात्र जिल्ह्यातील आरोग्य, रोजगार, पाणी, विद्युत पुरवठा, भ्रष्टाचार आदीबाबत निर्माण झालेल्या समस्याचे निराकरण करण्यास मात्र ढुंकूनही पाहत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेने कडून मच्छीमारांची व अन्य मतदारांची फसवणूक होत असल्याचे वास्तव मतदारांना आता समजू लागले असून विरोधी पक्षानेही सेनेच्या पोकळ आश्वासनाचा भंडाफोड करण्यास आपल्या प्रचारात सुरुवात केली आहे. त्यामुळे इतकी वर्षे सेनेचा बालेकिल्ला म्हणून नावलौकिक मिळवून देत त्यांच्या पदरात भरघोस मतदान टाकणाºया शिवसेनेने आम्हाला दिले काय? असा प्रश्न आता किनारपट्टीवरील मतदार विचारू लागला आहे.भाजप-सेना सरकारने मच्छीमाराना पोकळ आश्वासने देण्यापलीकडे काहीही दिलेले नाही. आमचे प्रश्न आजही जैसे थे आहेत. - संदीप म्हात्रे, राष्ट्रवादी युवक अध्यक्षआम्ही अनेक वर्षांपासून सेनेचे उमेदवाराला निवडून देत आहोत. मात्र आमचा भ्रमनिरास होत आहे. - दीपेश तामोरे, मच्छिमार, घिवली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेpalghar-acपालघरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019