शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

ग्रामीण परिसरातून होतेय हंडासंस्कृती हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 00:26 IST

प्लास्टिक कॅनचा वापर वाढला

अनिरुद्ध पाटील 

बोर्डी : पालघर जिल्हा हा शहरी, नागरी आणि डोंगराळ भाग असे जिल्ह्याचे स्वरूप आहे. पालघरमधून मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र दरवर्षी जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी पालघरवासीयांची स्थिती दरवर्षी होत असते. 

जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, मोखाडा, वाडा आदी तालुक्यांतील अनेक गावांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात असलेल्या धरणांतील पाणी मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर या शहरांना पुरवले जाते. मात्र धरणांशेजारीच असलेल्या अनेक गावांना मात्र पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. दरम्यान, डहाणू तालुक्यातील घोलवड गावातील मरवाडा या वस्तीतही पाणीटंचाई सुरू आहे. या ठिकाणी नळातील प्रवाहाचा दाब कमी असल्याने नागरिकांना तासनतास रांगेत थांबावे लागते. हंड्याने पाणी भरून घरापर्यंत नेताना, दिवसभरात वीस लिटरही भरले जात नाही. त्यामुळे प्लास्टिक ड्रमच्या वापराने हंडासंस्कृती हद्दपार होत आहे.

तालुक्यातील समुद्रकिनारी भागात जलस्त्रोतांचे पाणी मचूळ असून, उन्हाळ्यात हे प्रमाण वाढते. घोलवड ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजना राबवली आहे. मात्र ती सुरळीत नसल्याने एप्रिल, मे व जून महिन्यात टंचाई अधिक जाणवते. काही ठिकाणी जलवाहिनीला मोटारपंप जोडून होणाऱ्या पाणीचोरीने, प्रवाहाचा दाब कमी होतो, असे स्थानिक सांगतात. पाणी हंड्यात भरून पुन्हा रांगेत नंबर लावणे अशक्य होते. पुरवठा बंद करण्याच्या अंतिम टप्प्यात प्रवाहाचा दाब वाढल्यावर रांगेत लावलेले ड्रम भरले जातात. त्यानंतर सायकलीला ड्रम लावून वाहतूक केली जाते. पंधरा लिटरचा तेलाचा रिकामा प्लास्टिक ड्रम वापरला जातो. त्यातील पाण्याचा वापर शरीरास हानिकारक असला, तरी त्याकडे दुर्लक्ष करावे लागते, अशी व्यथा महिलांनी बोलून दाखवली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्याWaterपाणी