शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

ग्रामीण परिसरातून होतेय हंडासंस्कृती हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 00:26 IST

प्लास्टिक कॅनचा वापर वाढला

अनिरुद्ध पाटील 

बोर्डी : पालघर जिल्हा हा शहरी, नागरी आणि डोंगराळ भाग असे जिल्ह्याचे स्वरूप आहे. पालघरमधून मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र दरवर्षी जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी पालघरवासीयांची स्थिती दरवर्षी होत असते. 

जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, मोखाडा, वाडा आदी तालुक्यांतील अनेक गावांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात असलेल्या धरणांतील पाणी मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर या शहरांना पुरवले जाते. मात्र धरणांशेजारीच असलेल्या अनेक गावांना मात्र पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. दरम्यान, डहाणू तालुक्यातील घोलवड गावातील मरवाडा या वस्तीतही पाणीटंचाई सुरू आहे. या ठिकाणी नळातील प्रवाहाचा दाब कमी असल्याने नागरिकांना तासनतास रांगेत थांबावे लागते. हंड्याने पाणी भरून घरापर्यंत नेताना, दिवसभरात वीस लिटरही भरले जात नाही. त्यामुळे प्लास्टिक ड्रमच्या वापराने हंडासंस्कृती हद्दपार होत आहे.

तालुक्यातील समुद्रकिनारी भागात जलस्त्रोतांचे पाणी मचूळ असून, उन्हाळ्यात हे प्रमाण वाढते. घोलवड ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजना राबवली आहे. मात्र ती सुरळीत नसल्याने एप्रिल, मे व जून महिन्यात टंचाई अधिक जाणवते. काही ठिकाणी जलवाहिनीला मोटारपंप जोडून होणाऱ्या पाणीचोरीने, प्रवाहाचा दाब कमी होतो, असे स्थानिक सांगतात. पाणी हंड्यात भरून पुन्हा रांगेत नंबर लावणे अशक्य होते. पुरवठा बंद करण्याच्या अंतिम टप्प्यात प्रवाहाचा दाब वाढल्यावर रांगेत लावलेले ड्रम भरले जातात. त्यानंतर सायकलीला ड्रम लावून वाहतूक केली जाते. पंधरा लिटरचा तेलाचा रिकामा प्लास्टिक ड्रम वापरला जातो. त्यातील पाण्याचा वापर शरीरास हानिकारक असला, तरी त्याकडे दुर्लक्ष करावे लागते, अशी व्यथा महिलांनी बोलून दाखवली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्याWaterपाणी