शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

बुलेट ट्रेन नको, लोकल सुधारा; रेल्वे प्रवाशांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 06:39 IST

पालघर लोकसभा मतदार संघामध्ये डहाणू, बोईसर, पालघर, नालासोपारा आणि वसई या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, त्यातून पश्चिम रेल्वे धावते.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : १२ एप्रिल रोजी विरार लोकल ला १५२ वर्ष पूर्ण झाल्याचा मुहूर्त साधून या लोकलने प्रवास करणाऱ्या मतदारांची स्थानिक प्रश्नांविषयीची मते मतांतरे आणि त्यांना उमेदवाराविषयीच्या अपेक्षा याचा लोकमतने नुकताच आढावा घेतला.पालघर लोकसभा मतदार संघामध्ये डहाणू, बोईसर, पालघर, नालासोपारा आणि वसई या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, त्यातून पश्चिम रेल्वे धावते. थेट डहाणू रोडपर्यंत लोकल धावू लागल्याने या भागाचा समावेश उपनगरीय रेल्वेत होऊ लागला असतांना शहरी आणि नागरी अशा संमिश्र समस्या निर्माण झाल्याने, येणाºया शासनाकडून त्यांची सोडवणूक व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. डहाणू रोड ते वसई आणि वसई ते डहाणू रोड या दरम्यान थेट धावत्या लोकलमधून या प्रवाशांशी बातचीत केली असता, त्यांनी वेगवेगळे प्रश्न उपास्थित केले. यावेळी व्यवसायाने सिव्हील इंजिनियर असलेला आशिष राऊत म्हणाला कि, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा उत्तम प्रकारे सांभाळली आहे. काही मुद्दे दुर्लक्षिले गेले असले तरी त्यांच्या कार्यपद्धतीने युवकांना प्रभावित केले आहे. तर डहाणूतील धुंदलवाडी नजीकच्या शिसने या आदिवासी गावचा रहिवासी असलेला माह्या दळवी म्हणाला कि आम्ही मागील पाच-सहा महिन्यांपासून भूकंपाचे शेकडो धक्के सहन करतो आहोत. त्यामुळे परिसरातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी निम्म्या लोकांना पाच ते सहा हजाराची तुटपुंजी मदत मिळाली असली, तरी आजही लाभापासून वंचितांची संख्या अधिक आहे. पावसाळा जवळ आला असताना आम्ही मोकळ्या मैदानातील तंबूत किती दिवस राहायचे. मात्र डहाणू-तलासरी या तालुक्यातील अनेक गावं प्रभावित असतांना कोणत्याच राजकीय पक्षाकडून त्यांची दखल घेतली जात नसल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. तर वसई येथील निर्मळ या तिर्थक्षेत्राचे रहिवासी हिराजी रामचंद्र गावड सांगतात, कि मतदार संघाची पुनर्रचना होऊन पालघर नवीन मतदार संघ निर्माण झाला. त्यामुळे पूर्वीच्या मतदार संघा ऐवजी वसई-विरारचा समावेश झाल्यानंर येथील शहरी समस्यांबाबत या अन्य पक्षांपेक्षा बहुजन विकास आघाडीचे काम बरे असून भाजपाच्या दोन्ही खासदारांची कामिगरी त्यामुळे डावी ठरताना दिसते.

डहाणू रोड ते विरार लोकल प्रवासयावेळी वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, ओएनजीसीचे समुद्रातील सर्वेक्षण, समुद्रातील मासेमारी हद्दीचा वाद, एमआयडीसीची समुद्रात सोडलेली प्रदूषित पाण्याची पाईपलाईन बुलेट ट्रेन, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, मुंबई वडोदरा एक्स्प्रेसवे बेकायदेशीर सर्व्हे, तसेच विविध प्रकल्पांकरिता जमीन अधिग्रहण, कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन, सीआरझेड, सूर्या धरणाचा पाणी प्रश्न, कुपोषण अशा मुद्द्यांवर मतदारांनी आपली मते व्यक्त करून येणाºया शासनाकडून भूमिपुत्रांवर कोणतेही प्रकल्प लादण्यात येऊ नयेत शिवाय जिल्ह्यातील विविध समस्या प्राधान्याने सोडावाव्यात असे मत व्यक्त केले.
महायुती आणि महाआघाडीत जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे पक्ष विभागले गेल्याने सेनेचे गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात तुल्यबळ लढत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.एक लाख कोटीची बुलेट ट्रेन साकारण्यापेक्षा डहाणू ते मुंबई या लोकल सेवेचा विकास ५ हजार कोटी रु. खर्चून करण्यास प्राधान्य द्यावे, कारण बुलेट ट्रेन मुठभरांसाठी तर लोकल २५ लाख प्रवाशांसाठी आहे, असे प्रवासी म्हणाले

टॅग्स :western railwayपश्चिम रेल्वेVasai Virarवसई विरार