शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘हा विकास आहे की विनाश?', विखे पाटील यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 16:04 IST

 भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्‍ये विकासाचे स्‍वप्‍न दाखवून लोकांची मते घेतली. परंतु, सत्‍तेत आल्‍यानंतर त्‍यांनी विकास नव्‍हे तर विनाश सुरु केला आहे.

पालघर - विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी भाजपाच्या विकासाच्या मॉ़डेलवर जोरदार टीका केली.  भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्‍ये विकासाचे स्‍वप्‍न दाखवून लोकांची मते घेतली. परंतु, सत्‍तेत आल्‍यानंतर त्‍यांनी विकास नव्‍हे तर विनाश सुरु केला आहे. कोकण किनारपट्टीवर सर्वत्र हिच भावना असून पुढील काळामध्‍ये भाजप सरकारला त्‍याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिला आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील कॉंग्रेस आघाडीचे संयुक्‍त उमेदवार दामोदर शिंगडा यांच्‍या प्रचारार्थ बोईसर येथील वंजारी समाज सभागृहामध्‍ये आयोजित सभेत विखे पाटील यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली.  ते म्‍हणाले, ''भारतीय जनता पक्ष सर्वच आघाड्यावर साफ अपयशी ठरला आहे. दिलेली आश्‍वासने भाजपला पूर्ण करता आलेली नाहीत. त्‍यामुळेच केवळ लोकांची दिशाभूल करण्‍याचे काम त्‍यांनी सुरू केले आहे. लोकांचा विरोध झुगारूनही वाढवण बंदर, नाणार रिफायनरीसारखे प्रकल्‍प पूर्ण करण्‍याचे प्रयत्‍न सुरू आहेत. शिवसेना देखील भाजपच्‍या या पापात सहभागी असून, या प्रकल्‍पांना असलेला त्‍यांचा विरोध तोंडदेखला आहे. त्‍यामुळे शिवसेना कितीही नाकारत असली तरी या पापातील आपला सहभाग त्‍यांना टाळता येणार नाही.

भाजप विकास नव्‍हे तर विनाश करीत असल्‍याचा धागा धरून राधाकृष्‍ण विखे पाटील पुढे म्‍हणाले की, भाजप-शिवसेनेचे हे सरकार बुलेट ट्रेन, बडोदा एक्‍सप्रेस-वेसारखे प्रकल्‍प आदिवासींवर लादते आहे. या प्रकल्‍पांमुळे आदिवासी, शेतकरी आणि मच्छिमारांवर मोठा अन्‍याय होणार असतानाही भाजप आणि शिवसेनेचे सरकार याची दखल घ्‍यायला तयार नाही. त्यामुळेच या दोन्‍हीही पक्षांच्‍या विरुध्‍द जनतेत प्रचंड रोष असल्‍याचे वारंवार दिसून आले आहे. नागरिकांमधील हा रोष लक्षात येत असल्‍याने आता भारतीय जनता पक्षाने साम, दाम, दंड, भेद वापरून सत्‍ता ताब्‍यात ठेवण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि जेडीएस आघाडीचे बहुमत असतानाही भारतीय जनता पक्षाने ऐनकेन प्रकारे आपले सरकार स्‍थापन करण्‍याचा प्रकार केला. परंतु बहुमत नसल्‍याने अडीच दिवसात ते सरकार कोसळले. तरीही भाजपने ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी हास्‍यास्‍पद भूमिका घेतली आहे. 'अच्‍छे दिन'  आणण्‍याचे भाजपचे आश्‍वासन खोटे ठरले असून,  आता उमेदवार सुध्‍दा इतर पक्षातून आयात करण्‍याची वेळ भारतीय जनता पक्षावर ओढवल्‍याची बोचरी टिका विखे पाटील यांनी याप्रसंगी  केली. या सभेला काँग्रेस आघाडीचे उमेदवार दामोदर शिंगडा, विधान परिषदेचे आमदार आनंद ठाकूर आदी नेते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.  

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेसBJPभाजपा