शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

गडकिल्ले, पर्यटन स्थळांवर जाणाऱ्या अतिउत्साहींवर होणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 3:23 AM

जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशांचे उल्लंघन : पर्यटकांकडून होते मोठी गर्दी

पालघर : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील वाघोबा खिंडीतील काळदुर्ग या पर्यटनस्थळावर, नदी-नाले, धबधब्यांवर सध्या पर्यटकांकडून मोठी गर्दी केली जात असून जिल्हाधिकाºयांचा मनाई आदेश मोडून तरुणांचे मोठे गट पावसाचा आनंद लुटण्यासाठी एकत्र जमत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये पर्यटन स्थळांवर जाण्यास मनाई आदेश असतानाही कायद्याला न जुमानणाºया बेशिस्त लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येत आहे.

पालघरमधील समुद्रकिनारे, धबधबे, धरणे, नद्या, गडकिल्ले या ठिकाणी जाण्यास कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर व धोकादायक परिस्थिती उद्भवत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी मनाई आदेश काढून मज्जाव करण्यात आला आहे. मात्र या आदेशाला जिल्ह्यातील नागरिक केराची टोपली दाखवत असल्याचे समोर येते आहे. जव्हारच्या धबधब्यात अलीकडेच अपघात होऊन पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना त्याकडे दुर्लक्ष करून रविवारी, सोमवारी असणाºया सलग सुट्ट्यांचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात नागरिक गडकिल्ल्यांना भेटी देत आहेत. वाघोबा खिंडीतील काळदुर्ग किल्ल्यावर नागरिक ट्रेकिंगसाठी मोठी गर्दी करत असून पावसाचा आनंद लुटण्यासाठी लहान मुलांना घेऊन अनेक कुटुंबे नदी, धबधब्यांवर जात आहेत. एकीकडे जीवाला धोका तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असतानाही दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात लोक फिरत असून त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाकडून काहीही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे पाहायला मिळत आहे. काही पर्यटक केवळ मौजमजा करण्याच्या निमित्ताने पर्यटनस्थळी येत आहेत, तर अनेक जण मद्यप्राशन करण्यासाठी येत असून सोबत महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा सहभाग जास्त असल्याचे दिसून येत आहे.पालघर-मनोर महामार्गावरील काळदुर्ग हा डोंगर उंच असून येथे जाण्यासाठी केवळ पायवाटेचाच पर्याय आहे. पावसाळ्यात ही वाट अतिशय निसरडी असल्याने दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता असते. दुसरीकडे बिबळे, डुक्कर आदी जंगली श्वापदांसह सरपटणाºया विषारी जीवांचा वावरही पर्यटकांच्या जीवावर बेतू शकतो. मात्र अशा कुठल्याही धोक्याची पर्वा न करता फक्त धम्माल आणि काहीतरी अचाट फील अनुभवायच्या मस्तीसाठी सध्या शेकडो लोक फिरत आहेत.सध्या कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य सेवा, पोलीस, जिल्हा प्रशासन जीवापाड मेहनत घेत असताना काही बेकायदेशीर लोक प्रशासनाच्या कामात अतिरिक्त समस्या उभ्या करीत आहेत. अशा बेदरकार वागणाºयांवर कडक कारवाईसाठी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी दिली. 

टॅग्स :palgharपालघर