वसई : वाढत्या रुग्णसंख्येमुळे वसई-विरार शहरातील कोरोनाचा कहर अधिक गडद बनू लागला आहे. एप्रिल महिन्यात रुग्णवाढीचा वेग चार ते पाच पटीने वाढला आहे. सोमवारी वसईत ४९२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून दि. १ ते १२ एप्रिल दरम्यान तब्बल ६ हजार ५०४ वीन रुग्ण आढळून आले आहेत, तर या १२ दिवसांत २० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच केवळ २ हजार ४२२ रुग्ण आजवर मुक्त झाले आहेत.दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहराची चिंता अधिक वाढू लागली आहे. दरम्यान, मार्च महिन्यात दिवसाला सरासरी १०० रुग्ण आढळून येत होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}