शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार शहरात सफाई कामगारांकडून हाताने मैला स्वच्छ करून घेण्यासाठी पूर्ण बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 16:01 IST

तक्रारी आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार, महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आदेश

आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क

वसई:वसई विरार शहरात सफाई कामगारांकडून कुठल्याही नागरिकांच्या स्वतः ची संकुले, इमारती किंवा वाणिज्य आदी ठिकाणची त्यांच्या हाताने मैला व मल :जल स्वच्छ करण्यासाठी शासनाने पूर्णपणे बंदी घातली असून या संदर्भात शहरात कुठेही तसे आढळुन आल्यास अथवा महापालिका प्रशासनाकडे तश्या तक्रारी आल्यास संबंधितावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे आदेश आता वसई विरार शहर महापालिकेच्या  घनकचरा व्यवस्थापन विभागाने काढले असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमत ला दिली.

राज्य शासनाच्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज या कार्यक्रमाअंतर्गत शहरांतील  नागरिकांना इशारा देत  हाताने मैला व मलःजल वाहिन्या (भुयारी गटार) सफाई करणेबाबत शासनाने पूर्णतः बंदी आणली आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही नागरिकांनी त्यांच्या इमारतीच्या, घराच्या किंवा वाणिज्य इमारतीच्या मैला टाकी (सेप्टि टॅंक) सफाई करणेकरिता कोणत्याही खाजगी सफाई कामगारांकडून मानवीय रित्या सफाई करून घेऊन मैला टाकी यांची मानवीयरित्या सफाई करणे धोकादायक आहे.

यामुळे संबंधित कामगाराचे प्राण जाऊ शकतात. म्हणूनच अशा प्रकारचे काम करताना कोणी आढळल्यास संबंधित काम करून घेणाऱ्या तसे काम करणाऱ्या नागरिक अथवा संस्था,संघटना यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. ‘असे महापालिका प्रशासनाने म्हंटलं आहेदरम्यान हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुर्नवसन अधिनियम, २०१३’ या कायद्यान्वये पहिल्यांदा गुन्हा केल्यास २ वर्षांपर्यंत तुरुंगवास अथवा २ लाख रुपये दंड अथवा दोन्हीही शिक्षा संबंधित गुन्हेगारास होऊ शकते. 

तसेच सदर गुन्हा पुन्हा घडल्यास संबंधितावर ५ वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा ५ लाख रुपये दंड अथवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. तसेच मानवीय रित्या मैला टाकीची सफाई करून घेताना कोणतीही जीवित हानी झाल्यास संबंधित मृत सफाई कामगाराच्या कुटुंबाला १० लाख नुकसान भरपाई द्यावी लागेल.

गुन्हे टाळा व यांत्रिक पद्धतीने टाकी स्वच्छ करा

सदर बाब गंभीर असून संबंधित होणारा अपाय टाळण्यासाठी वसई - विरार शहर महानगरपालिकेद्वारे मैला टाकी यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी प्रत्येक प्रभागात १ या प्रमाणे ९ मैला गाड्या (सक्शन मशिन) कार्यरत केलेल्या आहेत. तसेच मलःजल वाहिन्या (भुयारी गटार) साफ करणेसाठी सक्शन कम जेटींग मशीनचा वापर केला जात आहे. 

नागरिकांच्या तक्रारी नोंदविणे व निराकरण करणेकरिता  महानगरपालिकेने विविध माध्यम उपलब्ध केलेले आहेत. यामध्ये ‘१४४२०’ ही टोल फ्री हेल्प लाईन सेवा सुरु करण्यात आलेली आहे. तसेच ८४४६६२२२८० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर नागरिक तक्रार नोंदवू शकतात. महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट https://vvcmc.in व V-click अॅप वर तक्रार नोंदवू शकतात. तसेच केंद्र शासनाच्या MoHUA Swachhta App वर तक्रार नोंदवू शकतात. सदर तक्रारीचे निराकरण करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वतंत्र दल स्थापित केलेले आहे. तसेच या संपुर्ण कार्यप्रणाली वर नियंत्रण ठेवण्यासाठी (ERSU) स्वछता शिघ्रकृती दलाची स्थापना मनपाद्वारे केली आहे.

नागरिकांनी काय करावे व काय करु नये (Do’s and Don’ts) याची माहिती खालीलप्रमाणे.

१. मैला टाकी व भुयारी गटारांच्या तक्रार नोंदविण्यासाठी १४४२० या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. अथवा https://vvcmc.in या अधिकृत वेबसाईट/ V-click App/ MoHUA Swachhta App वर तक्रार नोंदवावी. 

२. मैला टाकी आणि भुयारी गटारांची सफाई मनपाद्वारे किंवा मनपाने अधिकृत केलेल्या सफाई पुरवठादारा कडून करून घ्यावी.

३. दर ३ वर्षातून एकदा मैला टाकी ची सफाई करणे बंधनकारक आहे.

४. मैला टाकी आणि भुयारी गटारांची सफाई अनधिकृत पुरवठादाराकडून करून घेऊ नये. तसेच मानवीय (अयांत्रिकी) पद्धतीने सफाई करून घेऊ नये. असे केल्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काम करणारे अथवा करून घेणारे यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे ही महापालिका प्रशासनाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार