शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट रस्त्याबाबत वाड्यामध्ये तक्रार

By admin | Updated: March 27, 2016 02:17 IST

तालुक्यातील चंद्रपाडा जोड रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकम विभागाकडून करण्यात आले असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम

वाडा : तालुक्यातील चंद्रपाडा जोड रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकम विभागाकडून करण्यात आले असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांकडे केली आहे.कोंढले खैरे मुख्य मार्गापासून चंद्रपाडा गावाला जाण्यासाठी शेता बांधावरून जावे लागत होते. गेली अनेक वर्षे येथील नागरीकांची रस्त्याची मागणी होती परंतु त्याकडे प्रशासन चाल ढकल करीत होते. या वर्षी ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे १३ लाख १५ हजार रू. च्या निधीची तरतूद करून या रस्त्याच्या कामाला मंजूरी दिली.या रस्त्याच्या कामाचा ठेका जय प्रकाश मजूर कामगार सोसायटीला देण्यात आला आहे. या कामाकडे शाखा अभियंता सतिश मराडे याने दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराने या कामामध्ये माती जास्त वापरली असून खडी देखील मातीमिश्रीत वापरली आहे. शिवाय सुरूवातीपासूनच लेअर देखील कमी वापरले गेले त्यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या रस्त्यावर बी. बी. एम चे काम करताना डांबर मारते वेळी शाखा अभियंता गैरहजर राहील्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे ठेकेदाराने त्याचा फायदा घेत निकृष्ट दर्जाचे डांबर अल्प प्रमाणात वापरून वरचेवर काम उरकले त्यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा घसरला त्यामुळे रस्त्याचे सरफेसींग अल्पावधीतच नष्ट होण्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली आहे. (वार्ताहर) स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाला रस्तास्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या गावाला रस्ता मिळाला तोही निकृष्ट झाल्याने या रस्त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य माती, खडी, डांबर यांचे प्रयोग शाळेत परिक्षण बांधकाम विभागामार्फत करावे व दक्षता व गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून या कामाची चौकशी झाल्याखेरीज संबंधीत ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचे बील अदा करू नये अशी मागणी निवेदनात असून संबंधीत अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अरविंद कापडनिस यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी करून कारवाई करणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.