शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पशुपालन अर्थसाहाय्य योजना ठरली पांढरा हत्ती

By admin | Updated: October 15, 2014 23:22 IST

जिल्ह्यात वनविभागाचे क्षेत्र हे बरेच आहे. त्यामुळे पशुपालकांची संख्या ही लक्षणीय आहे. असे असतानाही चराईसाठी पशुधन मात्र मोठ्या प्रमाणात घटले चालले आहे. ते वाढावे यासाठी पशुपालन अथसहाय्य

वर्धा : जिल्ह्यात वनविभागाचे क्षेत्र हे बरेच आहे. त्यामुळे पशुपालकांची संख्या ही लक्षणीय आहे. असे असतानाही चराईसाठी पशुधन मात्र मोठ्या प्रमाणात घटले चालले आहे. ते वाढावे यासाठी पशुपालन अथसहाय्य योजना तयार करण्यात आली. पण शासकीय अधिकाऱ्यांच्या दफ्तरदिरंगाईमुळे ही योजना केवळ पांढरा हत्ती ठरत आहे.जिल्ह्यातील पशुधन घटत चालले आहे. ते वाढावे यासाठी शासनाने पशुपालन व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या आहेत. परंतु त्या योजना कागदावरच असल्याचे वास्तव दिसून येत आहे. जगण्याचे मुख्य साधन म्हणून शेतीकडे पाहिल्या जाते. आजही ग्रामीण भागातील जनतेचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीबरोबरच कुटुंबाचे अर्थचक्र व्यवस्थित चालावे यासाठी पशुपालनावर भर दिला जातो. सध्या पशूपालन हा व्यवसाय करीत असलेल्यांसाठी अनेक योजना आहेत. पण शासन त्याची योग्य माहितीच देत नसल्याने आणि अनुदान देताना त्रास देत असल्याने या योजना कागदावरच उरल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर शेती व्यवसायात सातत्याने वैशिष्टपूर्ण बदल झाले आहेत. अयोेग्य नियोजन, निसर्गाने न दिलेली साथ, व्यवसायासाठी कर्जाऊ घेतलेल्या भांडवलाचे वाढलेले व्याज, वाढती महागाई आदी प्रश्नांमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पशुपालन हा शेतकऱ्यासांठी आर्थिक आधार ठरत आहे. मात्र शासनाने राबविलेल्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचत नसल्याने आर्थिक स्वावलंबनात अनेक अडचणी येत आहेत. पाच वर्षात सतत होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता शासनाने पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांना अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या. परंतु, अद्यापही या योजनांचा पुरेपूर उपयोग झाला नाही, ग्रामीण भागात मोजक्याच लोकांना या योजनाबद्दलची माहिती मिळाली आहे. बऱ्याच लोकांना योजनाच माहित नसल्याने योजना या पांढरा हत्ती ठरत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)