शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात शेंग भरत असतानाच तुरीवर अळीचा अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 21:57 IST

Agriculture Wardha News सोयाबीन आणि कपाशी पीक हातचे गेल्याने यंदा तूर पिकावर शेतकऱ्यांची भिस्त होती. पण मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम असल्याने तूर पिकाची शेंग भरत असतानाच आता अळीचा प्रादुर्भाव त्यावर झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देढगाळी वातावरणाचा फटकाशेतकऱ्यांच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सोयाबीन आणि कपाशी पीक हातचे गेल्याने यंदा तूर पिकावर शेतकऱ्यांची भिस्त होती. पण मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम असल्याने तूर पिकाची शेंग भरत असतानाच आता अळीचा प्रादुर्भाव त्यावर झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. उंटावरून शेळ्या हाकलणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शेत शिवारात येत हवालदील शेतकऱ्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.

तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता चिकणी भागातील वृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. महागड्या किटकनाशकांची फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने उभे पीक उपटून टाकावे काय असा विचार सध्या या भागातील शेतकरी करीत आहेत. सप्टेंबर आणि अक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे तसेच बोगस बियाण्यांमुळे या भागातील सोयाबीन आणि कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचा यंदाच्या वर्षी चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यातून कसे बसे सावरत नाही तर कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. या संकटातून सावरण्यापूर्वीच आता तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीने अटॅक केला आहे. महागड्या किटकनाशकांची फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने कुंभकर्णी झोपेचे सोंग घेणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर येत त्यांना वेळीच मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.उत्पादनात घट येण्याची शक्यतापरिसरातील काही शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करतात. तर काही शेतकरी तुरीची सलग लागवड करतात. यंदाच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी समाधानकारक उत्पन्न होईल या आशेवर तूर पिकाची लागवड केली. पण अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा सोयाबीनची सवनगणी कराचे कामच पडले नाही. उभ्या पिकात जनावरे चराईसाठी सोडावी लागली. तर गुलाबी बोंडअळीमुळे कापसाच्या उत्पादनात बऱ्यापैकी घट आली आहे. या दोन्ही संकटातून बाहेर निघण्यापूर्वीच आता तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगूनही कुणी बांधावर पोहोचलेले नाही. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य सल्ला द्यावा.- मोरेश्वर घोडे, शेतकरी, चिकणी.

 

टॅग्स :agricultureशेती