शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

Wardha Blast : पोटाची आग शमविण्यासाठी डोक्यावर जिवंत बॉम्ब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 22:54 IST

पैशासाठी हपापलेला कंत्राटदार आणि त्याच्याकडून लाखोंची मलाई मिळत असल्याने लष्कराचे संबंधित अधिकारी सुरक्षेचे कोणतेही कवच न देता मजुरांना रोज मृत्यूच्या दाढेत पाठवत असल्याची संतापजनक माहिती आहे. जीवन-मरणाच्या लढाईत अडकलेले गरीब मजूर पोटाची आग शमविण्यासाठी आणि २०० ते ३०० रुपये पदरात पाडून घेण्यासाठी चक्क जीवघेणे बॉम्ब डोक्यावर वाहून नेत होते.

ठळक मुद्देकंत्राटदार मिळवतो रोज ५ लाख, मजुरांच्या हातात २०० रुपये

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पैशासाठी हपापलेला कंत्राटदार आणि त्याच्याकडून लाखोंची मलाई मिळत असल्याने लष्कराचे संबंधित अधिकारी सुरक्षेचे कोणतेही कवच न देता मजुरांना रोज मृत्यूच्या दाढेत पाठवत असल्याची संतापजनक माहिती आहे. जीवन-मरणाच्या लढाईत अडकलेले गरीब मजूर पोटाची आग शमविण्यासाठी आणि २०० ते ३०० रुपये पदरात पाडून घेण्यासाठी चक्क जीवघेणे बॉम्ब डोक्यावर वाहून नेत होते.वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात रोजगाराची वाणवा आहे. त्यामुळे येथील तरुण मिळेल ते काम करतात. तालुक्यातील पुलगावचे केंद्रीय दारुगोळा भंडार केवळ भारतात नव्हे तर आशिया खंडात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देशाच्या सैन्यदलासाठी वापरण्यात येणारा दारुगोळा संग्रहित केला जातो. कालबाह्य दारुगोळा नष्ट करण्याचेही काम या परिसरात होते. पूर्वी लष्कराचे अधिकारी प्रशिक्षित अधिकारी आणि तंत्रज्ञांच्या देखरेखीत दारुगोळा नष्ट करण्याचे काम करायचे. खासगीकरण आणि त्याला चिकटलेली भ्रष्टाचाराची कीड या महत्त्वपूर्ण आणि धोकादायक कामापर्यंतही पोहचली. पुलगावच्या चांडक बंधूने राजकीय वजन वापरून त्यांनी हे कंत्राट मिळवले अन् गेल्या काही वर्षांपासून त्यांनी दारुगोळा नष्ट करण्याचे काम सुरू केले. बॉम्ब नष्ट करण्यासाठी स्फोट घडविल्यानंतर सुमारे दोन क्विंटल लोखंड (तुकडे) आणि इतर धातूचे तुकडे असे सुमारे ५ ते ६ लाखांचे साहित्य त्यातून बाहेर पडतात. यातील १५ ते २० टक्के धातू मजुरांकडून उचलून नेली जाते. त्या बदल्यात प्रत्येक मजुराला २०० ते ३०० रुपये मिळतात. तर, उर्वरित धातू कंत्राटदार चांडक बंधूच्या घशात जाते. त्यातून त्याला ४ ते ५ लाख रुपये मिळतात. कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही, अशी माहिती आतमध्ये काम करणाऱ्यांपैकी काहींनी घटनास्थळी लोकमतला सांगितली. दरम्यान, ही घटना घडल्यापासून चांडक बंधू ‘आऊट आॅफ कव्हरेज एरिया’ आहे.भावनाशून्य व्यवहार !या भीषण घटनेत जीव गमविलेल्या आणि गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देणाऱ्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे. दुसरीकडे चांडक बंधूने स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी धावपळ चालविली आहे. या गुन्ह्यासाठी आपल्याला जबाबदार धरू नये तसेच याला अपघाताचे रूप देऊन आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल होऊ नये म्हणून, राजकीय नेत्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरुआहेत.

टॅग्स :Wardha Blastवर्धा स्फोटBombsस्फोटके