शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Wardha Blast : पोटाची आग शमविण्यासाठी डोक्यावर जिवंत बॉम्ब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 22:54 IST

पैशासाठी हपापलेला कंत्राटदार आणि त्याच्याकडून लाखोंची मलाई मिळत असल्याने लष्कराचे संबंधित अधिकारी सुरक्षेचे कोणतेही कवच न देता मजुरांना रोज मृत्यूच्या दाढेत पाठवत असल्याची संतापजनक माहिती आहे. जीवन-मरणाच्या लढाईत अडकलेले गरीब मजूर पोटाची आग शमविण्यासाठी आणि २०० ते ३०० रुपये पदरात पाडून घेण्यासाठी चक्क जीवघेणे बॉम्ब डोक्यावर वाहून नेत होते.

ठळक मुद्देकंत्राटदार मिळवतो रोज ५ लाख, मजुरांच्या हातात २०० रुपये

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पैशासाठी हपापलेला कंत्राटदार आणि त्याच्याकडून लाखोंची मलाई मिळत असल्याने लष्कराचे संबंधित अधिकारी सुरक्षेचे कोणतेही कवच न देता मजुरांना रोज मृत्यूच्या दाढेत पाठवत असल्याची संतापजनक माहिती आहे. जीवन-मरणाच्या लढाईत अडकलेले गरीब मजूर पोटाची आग शमविण्यासाठी आणि २०० ते ३०० रुपये पदरात पाडून घेण्यासाठी चक्क जीवघेणे बॉम्ब डोक्यावर वाहून नेत होते.वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात रोजगाराची वाणवा आहे. त्यामुळे येथील तरुण मिळेल ते काम करतात. तालुक्यातील पुलगावचे केंद्रीय दारुगोळा भंडार केवळ भारतात नव्हे तर आशिया खंडात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देशाच्या सैन्यदलासाठी वापरण्यात येणारा दारुगोळा संग्रहित केला जातो. कालबाह्य दारुगोळा नष्ट करण्याचेही काम या परिसरात होते. पूर्वी लष्कराचे अधिकारी प्रशिक्षित अधिकारी आणि तंत्रज्ञांच्या देखरेखीत दारुगोळा नष्ट करण्याचे काम करायचे. खासगीकरण आणि त्याला चिकटलेली भ्रष्टाचाराची कीड या महत्त्वपूर्ण आणि धोकादायक कामापर्यंतही पोहचली. पुलगावच्या चांडक बंधूने राजकीय वजन वापरून त्यांनी हे कंत्राट मिळवले अन् गेल्या काही वर्षांपासून त्यांनी दारुगोळा नष्ट करण्याचे काम सुरू केले. बॉम्ब नष्ट करण्यासाठी स्फोट घडविल्यानंतर सुमारे दोन क्विंटल लोखंड (तुकडे) आणि इतर धातूचे तुकडे असे सुमारे ५ ते ६ लाखांचे साहित्य त्यातून बाहेर पडतात. यातील १५ ते २० टक्के धातू मजुरांकडून उचलून नेली जाते. त्या बदल्यात प्रत्येक मजुराला २०० ते ३०० रुपये मिळतात. तर, उर्वरित धातू कंत्राटदार चांडक बंधूच्या घशात जाते. त्यातून त्याला ४ ते ५ लाख रुपये मिळतात. कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही, अशी माहिती आतमध्ये काम करणाऱ्यांपैकी काहींनी घटनास्थळी लोकमतला सांगितली. दरम्यान, ही घटना घडल्यापासून चांडक बंधू ‘आऊट आॅफ कव्हरेज एरिया’ आहे.भावनाशून्य व्यवहार !या भीषण घटनेत जीव गमविलेल्या आणि गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देणाऱ्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे. दुसरीकडे चांडक बंधूने स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी धावपळ चालविली आहे. या गुन्ह्यासाठी आपल्याला जबाबदार धरू नये तसेच याला अपघाताचे रूप देऊन आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल होऊ नये म्हणून, राजकीय नेत्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरुआहेत.

टॅग्स :Wardha Blastवर्धा स्फोटBombsस्फोटके