शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

Wardha Blast : पोटाची आग शमविण्यासाठी डोक्यावर जिवंत बॉम्ब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 22:54 IST

पैशासाठी हपापलेला कंत्राटदार आणि त्याच्याकडून लाखोंची मलाई मिळत असल्याने लष्कराचे संबंधित अधिकारी सुरक्षेचे कोणतेही कवच न देता मजुरांना रोज मृत्यूच्या दाढेत पाठवत असल्याची संतापजनक माहिती आहे. जीवन-मरणाच्या लढाईत अडकलेले गरीब मजूर पोटाची आग शमविण्यासाठी आणि २०० ते ३०० रुपये पदरात पाडून घेण्यासाठी चक्क जीवघेणे बॉम्ब डोक्यावर वाहून नेत होते.

ठळक मुद्देकंत्राटदार मिळवतो रोज ५ लाख, मजुरांच्या हातात २०० रुपये

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पैशासाठी हपापलेला कंत्राटदार आणि त्याच्याकडून लाखोंची मलाई मिळत असल्याने लष्कराचे संबंधित अधिकारी सुरक्षेचे कोणतेही कवच न देता मजुरांना रोज मृत्यूच्या दाढेत पाठवत असल्याची संतापजनक माहिती आहे. जीवन-मरणाच्या लढाईत अडकलेले गरीब मजूर पोटाची आग शमविण्यासाठी आणि २०० ते ३०० रुपये पदरात पाडून घेण्यासाठी चक्क जीवघेणे बॉम्ब डोक्यावर वाहून नेत होते.वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात रोजगाराची वाणवा आहे. त्यामुळे येथील तरुण मिळेल ते काम करतात. तालुक्यातील पुलगावचे केंद्रीय दारुगोळा भंडार केवळ भारतात नव्हे तर आशिया खंडात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देशाच्या सैन्यदलासाठी वापरण्यात येणारा दारुगोळा संग्रहित केला जातो. कालबाह्य दारुगोळा नष्ट करण्याचेही काम या परिसरात होते. पूर्वी लष्कराचे अधिकारी प्रशिक्षित अधिकारी आणि तंत्रज्ञांच्या देखरेखीत दारुगोळा नष्ट करण्याचे काम करायचे. खासगीकरण आणि त्याला चिकटलेली भ्रष्टाचाराची कीड या महत्त्वपूर्ण आणि धोकादायक कामापर्यंतही पोहचली. पुलगावच्या चांडक बंधूने राजकीय वजन वापरून त्यांनी हे कंत्राट मिळवले अन् गेल्या काही वर्षांपासून त्यांनी दारुगोळा नष्ट करण्याचे काम सुरू केले. बॉम्ब नष्ट करण्यासाठी स्फोट घडविल्यानंतर सुमारे दोन क्विंटल लोखंड (तुकडे) आणि इतर धातूचे तुकडे असे सुमारे ५ ते ६ लाखांचे साहित्य त्यातून बाहेर पडतात. यातील १५ ते २० टक्के धातू मजुरांकडून उचलून नेली जाते. त्या बदल्यात प्रत्येक मजुराला २०० ते ३०० रुपये मिळतात. तर, उर्वरित धातू कंत्राटदार चांडक बंधूच्या घशात जाते. त्यातून त्याला ४ ते ५ लाख रुपये मिळतात. कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही, अशी माहिती आतमध्ये काम करणाऱ्यांपैकी काहींनी घटनास्थळी लोकमतला सांगितली. दरम्यान, ही घटना घडल्यापासून चांडक बंधू ‘आऊट आॅफ कव्हरेज एरिया’ आहे.भावनाशून्य व्यवहार !या भीषण घटनेत जीव गमविलेल्या आणि गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देणाऱ्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे. दुसरीकडे चांडक बंधूने स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी धावपळ चालविली आहे. या गुन्ह्यासाठी आपल्याला जबाबदार धरू नये तसेच याला अपघाताचे रूप देऊन आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल होऊ नये म्हणून, राजकीय नेत्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरुआहेत.

टॅग्स :Wardha Blastवर्धा स्फोटBombsस्फोटके