शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजी नव्हेच...असुविधांचा बाजार

By admin | Updated: August 2, 2015 02:40 IST

शहरातील मुख्य भाजीबाजार सध्या असुविधांचा बाजार म्हणूनच समोर येत आहे. जागेचा तिढा, विकास आराखडा तयार असतानाही लिजची वाढत

वर्धा : शहरातील मुख्य भाजीबाजार सध्या असुविधांचा बाजार म्हणूनच समोर येत आहे. जागेचा तिढा, विकास आराखडा तयार असतानाही लिजची वाढत नसलेली मुदत, सुविधा देणारा आणि कर वसूल करणारा या दोन विभागातील तफावत या संपूर्ण प्रकारामुळे असुविधाच वाढताना दिसतात. याचा त्रास केवळ भाजी विक्रेत्यांनाच होतो असे नव्हे तर संपूर्ण शहरातील ग्राहकांना हा त्रास सहन करावा लागतो. कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनही याकडे लक्ष देत नसल्याने भाजी बाजाराचा प्रश्न सोडवणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील मुख्य भाजी बाजार बजाज चौकाच्या शेजारी भरविला जातो. शेतकऱ्यांशी निगडीत बाब म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सदर जागा बाजारासाठी देण्यात आली. गत कित्येक वर्षांपासून या जागेवर बाजार भरविला जातो. जागा कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेली असली तरी त्या बाजाराचा कर मात्र नगर परिषद प्रशासनाद्वारे वसूल केला जातो. यामुळे अद्यापही या बाजाराचा विकास आणि विस्तार होऊ शकलेला नाही. बाजाराला कुठल्याही सुविधा पुरविता आलेल्या नाहीत. अद्याप वर्धा शहरातील बाजारात ओट्यांचीही सोय नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल. शेतीशी निगडीत बाब असल्याने शेतकऱ्यांना आपले भाजीपाला वर्गीय उत्पादन विकता यावे, त्यासाठी भटकावे लागू नये म्हणून बाजार समितीने ही जागा बाजाराला दिली. शेतकरी आपला माल तेथे विकू लागले; पण अद्याप बाजाराचा विकास होऊ शकला नाही. पावसाळ्यात बाजारामध्ये सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असते. ग्राहकांना फिरण्याकरिता व्यवस्थित जागा नाही. भाजी घेऊन येणाऱ्या वाहनांना बाजारात माल उतरवताना तारेवरची कसरत करावी लागते. एखादे वाहन रस्त्यावर अडकले तर वाहतुकीचा पचका होतो. शिवाय बाजारातही दुकानदार व ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. वाहने उभी करण्याकरिता कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. भाजी विक्रेत्यांना बसण्याकरिता पुरेशी जागा नाही. मोठी जागा रिक्त असून तेथे केवळ कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. शिवाय गुरांचा मुक्त संचार आणि व्यवस्थेच्या अभावामुळे त्रास सहन करावा लागतो. बाजार म्हटला की, भाजीपाला या दुकानातून त्या दुकानात, एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्या व्यापाऱ्याकडे नेला जातो. शिवाय अनेक किरकोळ भाजी विक्रेतेही या मुख्य बाजारात भाजी घेण्यासाठी येतात. ही संपूर्ण व्यवस्था सुरळीत करण्याकरिता प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.