शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
5
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
6
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
7
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
8
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
9
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
10
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
11
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
12
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
13
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
16
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
17
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
18
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
19
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
20
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
Daily Top 2Weekly Top 5

झाडे होताहेत आगीत स्वाहा

By admin | Updated: June 4, 2016 01:52 IST

सध्या उन्हाळवाहीची कामे सुरू आहेत़ यात शेतकरी शेतातील कचरा गोळा करून तो पेटवून देतात़ शिवाय धुऱ्यावर वाढलेले तणही पेटविले जाते़ ...

जिल्ह्यात सर्वत्र हाच प्रकार : धुरे जाळताना झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी
वायगाव (नि.) : सध्या उन्हाळवाहीची कामे सुरू आहेत़ यात शेतकरी शेतातील कचरा गोळा करून तो पेटवून देतात़ शिवाय धुऱ्यावर वाढलेले तणही पेटविले जाते़ यात शेतातील तसेच लगतची झाडेही आगीच्या स्वाधीन केली जात असल्याचे दिसते़ हा प्रकार सध्या वायगाव मार्गावरच नव्हे तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू आहे. यामुळे मोठमोठी झाडे आगीच्या भक्षस्थानी येत आहेत.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा तुकाराम महाराजांचा अभंग मानवाच्या जीवनातील झाडांचे महत्त्व सांगून जातो़ शासनालाही वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व कळले आहे़ यामुळेच वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे; पण या बाबी अद्याप शेतकऱ्यांना अवगत झाल्याचे दिसत नाही़ आजही पूर्वीप्रमाणेच शेतकरी शेतातील कचरा शेतातच जाळतात़ शिवाय धुऱ्यांनाही आग लावल्या जाते. यामुळे शेताच्या शेजारी व रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची राखरांगोळी होताना दिसते़ काही लाकूड चोरही याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसते़ अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना आगी लावल्या जातात़ ही वृक्षे जमिनीवर कोसळली की, ते लाकून चोरून नेले जाते़ या प्रकारामुळे वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे दिसते़
वायगाव मार्गावरील अनेक शेतांचे धुरे दररोज पेटविले जात असल्याचे दिसते़ यात धुऱ्यावरील वृक्ष जळत असल्याने ते जमिनीवर कोसळत आहेत़ शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घेऊन धुरे पेटविणे बंद करणे गरजेचे आहे़(वार्ताहर)

वृक्षसंवर्धनाची गरज

रस्त्याच्या दुतर्फा, शेताच्या बांधावर पूर्वी झाडे लावली जात होती़ यात आंबा, चिंच, बिहाडा आदी झाडे दिसून येत होती़ माकडांचे कळप याच झाडांवर आश्रय घेत असल्याने पिकांची नासाडी होत होती़
हा मनस्ताप दूर करण्यासाठीही शेतकरी ही झाडे कापत असल्याचे दिसते़ अनेक मार्गांवरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे कधी जाळली गेली तर कधी कापली़ शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारी बाभूळही आता दिसत नाही़ यामुळे रोड व शेती उजाड झाली़ अनेक मोठी वृक्षेही कोसळण्याच्या मार्गावर आहे़ या वृक्षांचे संवर्धन करणेच गरजेचे झाले आहे़ या काही वर्षात रस्त्याच्या काठावर असलेली हजारो झाडे जळाली आहेत. या तुलनेत वृक्ष लागवड न झाल्याने पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे.