शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलावर वाहतुकीचा खोळंबा

By admin | Updated: April 6, 2016 02:15 IST

शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलासह शहरातील रस्तेही वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अरूंद भासू लागले आहेत.

रूंदीकरणाचा प्रश्न खितपत : मंजुरीनंतरही प्रक्रिया रखडल्याने कामकाजावर प्रश्नचिन्ह
वर्धा : शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलासह शहरातील रस्तेही वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अरूंद भासू लागले आहेत. परिणामी, अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारीही शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर एका वाहनात बिघाड आल्याने तब्बल तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे वाहन धारकांना त्रास सहन करावा लागला. या पुलाच्या रूंदीकरणाची प्रक्रिया अद्यापही पूढे न सरकल्याने दररोजच वाहनांच्या रांगा लागत असल्याचे दिसते.
शहरातून बाहेर जाणाऱ्या आचार्य विनोबा भावे रेल्वे उड्डाण पुलाच्या रूंदीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी प्राप्त झाली आहे. प्रथम काही वर्षे रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगत पुलाचे रूंदीकरण रखडले होते. आता रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली असताना पुलाचे भिजत घोंगडे कायम आहे. रेल्वे उड्डाण पुलाच्या रूंदीकरणासाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासन यांची परवानगी गरजेची असते. यामुळे प्रथम राज्य शासनाकडे रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळविण्यात आली. यानंतर रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. सदर प्रस्तावालाही मंजुरी प्राप्त झाली आहे. शिवाय रेल्वे अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली. राज्य शासनानेही पुलाच्या रूंदीकरणासाठी निधीची तरतूद केली; पण अद्यापही प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येत आहे. रेल्वे आणि राज्य शासनाची मंजुरी मिळून निधीचा मार्ग मोकळा झाल्याने त्वरित हालचाली अपेक्षित होत्या; पण अद्याप कुठलीही पावले उचलली जात नसल्याचेच दिसते. काही महिन्यांपूर्वी रूंदीकरण कामासाठी मोजणी करण्यात आली होती; पण त्या पूढे प्रक्रिया सरकल्याचेच दिसत नाही.
आचार्य विनोबा भावे रेल्वे उड्डाण पूल अत्यंत अरूंद असल्याने दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. या पुलावरून हिंगणघाट, यवतमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाण्याकरिता रस्ता आहे. या अरूंद पुलावर एखादे वाहन नादुरूस्त झाले तर तीनही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागतात. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक वाहन पुलावर नादुरूस्त झाले. यामुळे बजाज चौकातील चारही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शिवाय यवतमाळ आणि हिंगणघाट मार्गावरही वाहनांचा रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांना तब्बल एक तास कसरत करून वाहतूक सुरळीत करावी लागली. हा प्रकार नित्याचा झाल्याने रूंदीकरण गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)